शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना घरकुलांसाठी विनामुल्य मिळणार, आ. आशुतोष काळेंची मोठी घोषणा

  • Written By: Published:
शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना घरकुलांसाठी विनामुल्य मिळणार, आ. आशुतोष काळेंची मोठी घोषणा

Ashutosh Kale : आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना तसेच सार्वजनिक कामासाठी मिळणार आहे. ज्याचा फायदा आता संवत्सर, कोकमठाण, जळगाव, वाकडी आदी गावांना होणार आहे. काही दिवसांपूर्वी कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले होते मात्र स्वत:ची जागा नसल्यामुळे हे पात्र लाभार्थी घरकुलाचा लाभ घेवू शकत नव्हते त्यामुळे लाभार्थींना जागा कशी मिळणार यासाठी प्रयत्न सुरु होते.

कोपरगाव मतदारसंघात शेती महामंडळाच्या जमिनी उपयोगात आणून त्या जमिनी स्वत:ची जागा नसलेल्या घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना तसेच ज्या ज्या गावात पाणी पुरवठा योजना, साठवण तलाव, स्मशान भूमी अशा सार्वजनिक कामांसाठी कशा मिळविता येतील याबाबत आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. अनेक ठिकाणी शेकडो एकर जमीन पडीत आहे.

शेती महामंडळ बंद पडल्यामुळे या जमिनी पडीत होत्या या जमिनींचा लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी उपयोगात आणल्यास साठवण तलाव, गावतळे, पाझर तलाव यांची निर्मिती करून पाणी प्रश्न कायमचा सुटू शकतो. या जमिनी पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून उपलब्ध झाल्यास या जमिनीवर साठवण तलाव, गावतळे, पाझर तलावांची निर्मिती करून हे स्त्रोत गोदावरी कालव्याच्या प्रत्येक आवर्तनातून भरून घेवून पाणी प्रश्न सोडविण्या बरोबरच आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिर व कूपनलिकांना त्याचा फायदा होवू शकतो.

या उद्देशातून आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी निवडून येताच 2020 मध्ये शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून कशा प्रकारे शेती महामंडळाच्या जमिनी जागा नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांना व मतदार संघातील ग्रामपंचायतींना मिळवून देता येतील याबाबत चाचपणी करून पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्यातून शेती महामंडळाने जमिनी देण्यासाठी सहमती दिली मात्र सदरच्या जमिनीची चालू बाजारभाव प्रमाणे येणाऱ्या मूल्यांकनाची शेती महामंडळाने केलेली मागणी ग्रामपंचातीच्या आवाक्याबाहेर होती त्याप्रमाणे स्वत:ची जागा नसलेल्या घरकुलासाठी पात्र ठरलेले लाभार्थी देखील जमिनीचे बाजार मूल्य शेती महामंडळाला देवू शकत नव्हते. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शेती महामंडळाच्या जमीनी स्वत:ची जागा नसलेल्या घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना तसेच ज्या ज्या गावात पाणी पुरवठा योजना, साठवण तलाव, स्मशान भूमी अशा सार्वजनिक कामांसाठी विनामुल्य मिळाव्यात यासाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून शेती महामंडळाच्या जमिनी घरकुलासाठी गरजू लाभार्थ्यांना तसेच सार्वजनिक कामासाठी ग्रामपंचायतींना विनामुल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा कोपरगाव मतदार संघातील संवत्सर, कोकमठाण, जळगाव, वाकडी आदी गावांना फायदा होणार असून या गावातील नागरिकांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे. शेती महामंडळाचे कामगार मागील तीन पिढ्यापासून विविध गावात राहत होते परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नव्हत्या.

एलमवाडी सारख्या गावात तर ग्रामपंचायत मालकीची स्वत:ची जागा नसल्यामुळे स्मशानभूमी नव्हती. परंतु आमदार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून शेती महामंडळाची जागा उपलब्ध होऊन एलमवाडी स्मशानभूमी होवू शकली.

ना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं

तसेच घरकुलासाठी ज्या कर्मचाऱ्यांना स्वतःची जागा नाही त्यांना दोन गुंठे जागा विनामुल्य देण्याचा निर्णय ऐतिहासिक असून त्यामुळे मागील पन्नास वर्षांचा प्रश्न मार्गी लागला असून आमदार आशुतोष काळे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहेच परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची त्यांना जाणीव आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube