Video : अधिवेशन किती काळ चालणार अन् विरोधी पक्षनेता कधी नेमणार?, विरोधकांना फडणवीसांचे थेट उत्तर

राज्यात शेतकरी हवालदील आहे, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला, त्यावर मुख्यमंत्री बोलले.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 07T193243.141

सोमवारपासून (8 डिसेंबर) राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. (Fadanvis) नागपूरला एकूण सात दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच विरोधकांच्या बाजूने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर वेगवेगळे आरोप केले. राज्यात शेतकरी हवालदील आहे, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

आता याच आरोपांना सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे बोलण्यासाठी विषय नाही. त्यांची पत्रकार परिषद निराशेने भरलेली होती, असा पलटवार फडणवीस यांनी केली. तसंच, त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. ‘विरोधकांची पत्रकार परिषद ही निराशेने भरलेली आणि त्रागा करणारी होती. त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या. काँग्रेस पक्ष प्रामाणिक होता, अशी उपरती भास्कर जाधव यांना झाली. विरोधकांना पत्रावर सह्या करायलाच कोणी भेटले नाही,’ अशी टोलेबाजी फडणवीस यांनी केली.

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हं; अधिवेशनातील चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

काँग्रेस नेते आज वडेट्टीवार विदर्भावरही बोलले. पण मला सांगायचं आहे की 2014 सालापूर्वीचा आणि 2014 सालानंतरचा विदर्भ त्यांनी बघावा. विदर्भात काय बदल घडलेला आहे, हे त्यांना समजेल, असा पलटवारही त्यांनी केला. शनिवार, रविवारीदेखील अधिवेशन होणार आहे. पळून जाण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही. सध्या सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही, असा आक्षेपही महाविकास आघाडीने उपस्थित केला. यावर बोलताना विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असं फडणवीस म्हणाले.

वडेट्टीवार काय म्हणाले?

सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला चहापानाचं निमंत्रण मिळालं असून दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नाहीत. संवैधानिक पदं रिक्त ठेऊन संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सरकारच्या चहापानाचा आम्ही जाणार नाही. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकरी कर्जमाफीचा पत्ता नाही. त्याचप्रमाणे येथून मागे देखील विरोधकांची संख्या कमी असून देखील काँग्रेसने कधी संवैधानिक पद रिक्त ठेवले नाही, यांना विरोधकांची भीती वाटते की काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

follow us