खंडणीसाठी मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली का? CM फडणवीस म्हणाले, ‘हे काम अतिशय…’

Devendra Fadnavis : आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केला होता. धनंजय मुंडे यांच्या ‘सातपुडा’ या सरकारी बंगल्यावर पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी बैठक झाली होती, असा आरोप धस यांनी केला होता. दरम्यान, धस यांनी केलेल्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता मोठं भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर खरंच खंडणीसाठी बैठक झाली होती का? याविषयी धनंजय मुंडे यांची चौकशी का केली जात नाही? असा सवाल फडणवीस यांना विचारला असता त्यांनी सविस्तर भाष्य केलं. ते म्हणाले की, पहिली गोष्ट अशी आहे की, हे काम अतिशय प्रोफेशनली झालं. आता केंद्र सरकारने जो नवा कायदा बनवला आहे. भारतीय न्याय संहिता. त्या भारतीय न्याय संहितेनुसार, पहिल्यांदा खंडणीची जी केस असते, तेव्हा जर दुसरी एखादी घटना झाली तर तेव्हा दोन घटनांना लिंक करून खंडणीच्या घटनेला आपण मोठी घटना म्हणू शकतो किंवा मास्टरमाईंड म्हणू शकतो. अशी प्रोव्हिजन आपल्या कायद्यात पहिल्यांदा झाली. मला वाटतं की हा कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा बीडमधील खंडणीची घटना घडली आहे. या खंडणीच्या प्रकरणाला या नव्या कायद्यात घेण्यात आलं, आहे, असं फडणवीस म्हणाले.
पुढं ते म्हणाले, या तपासात सीआयडीवर कोणाचाही दबाव नाही. जर धनंजय मुंडे यात सामील असते किंवा एक जरी पुरावा सीआयडीला मिळाला असता तर सीआयडीने कारवाई केली असती. पण माझ्या माहितीनुसार, अशी कोणतीही माहिती समोर आली नाही. आता आमच्या पक्षाचेही काही नेते आरोप करतात, विरोधी पक्षाचेही काही नेते आरोप करतात. पण फक्त आरोप करून काहीही होत नाही. कायदा हा भावनांच्या आधारे चालत नाही. लोक भावनेवर आधारित बोलतात. आता या बीडच्या प्रकरणात आम्ही एवढे पुरावे मिळवले आहेत की, त्या आरोपींमधील कोणीही सुटणार नाही, तसेच कठोरातील कठोर शिक्षा त्यांना होईल, असं फडणीस म्हणाले.
मुस्लिमांसाठीही औरंगजेब हिरो असू शकत नाही
छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी ९ वर्षे लढा दिला. त्यातली एकही लढाई ते हरले नाहीत. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कपट करून पकडलं, त्यानंतर ज्या कौर्याने त्याने संभाजी महाराजांना मारलं, त्यामुळं भारतातल्या हिंदूंच नाही तर मुस्लिमांसाठीही औरंगजेब कधी हिरो असू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.