Maratha Reservation : मनोज जरांगे मागतात ते आरक्षण टिकेल का? संभाजीराजेंचा सवाल

Maratha Reservation : मनोज जरांगे मागतात ते आरक्षण टिकेल का? संभाजीराजेंचा सवाल

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील जे आरक्षण मागताहेत ते टिकेला का? असा सवाल उपस्थित करीत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्यानंतर अखेर सरकारने मराठवाड्यात निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला आहे, त्यानूसार दिलेलं आरक्षण टिकेल का? असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आईला पाहून जरांगेंना अश्रू अनावर… म्हणाले, ‘हत्तीचं बळं आलं, आता आरक्षणासाठी एकही मुडदा पडू देणार नाही’

संभाजीराजे म्हणाले, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अनेक वर्षांपासून लढत आहेत. आधी त्यांची मागणी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणात द्यावीत, आता ते म्हणतायत की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, पण असे दिलेले आरक्षण टिकेल का? सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट देऊन दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार असेल तरच द्यावे, अन्यथा ती समाजाची फसवणूक ठरणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले आहेत.

हवं तर ‘भारत’ नाव आम्ही घेतो पण, जनतेच्या डोक्यावर.. सुळेंनी मोदी सरकारवर सुनावलं

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात एकूण 58 मोर्चे निघाले होते, या मोर्चाची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. फडणवीस सरकारने आरक्षण जाहीर केल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला होता, मात्र न्यायालयात आरक्षण रद्द करण्यात आलं होतं, सरकारनेही दुर्लक्ष केलं, गायकवाड समितीचा अहवाल म्हणावा तसा सादर केला नसल्यानेच आरक्षण रद्द करण्यात आल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

मागासवर्ग आयोगाबाबत पुर्नगठन करणं गरजेचं आहे, त्यानंतरच मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करुन आरक्षण द्यायचं की नाही? हे ठरवावं, केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्ही सत्तेत नसतानाही हेच बोलत होतात, आत्ताही हेच बोलत आहात? आता तुम्ही सरकारमध्ये आहेत तुम्ही ठरवा आरक्षण द्या, तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही हे सगळं करु शकता, नसेल जमत तर आम्ही ते करु शकतो, असा इशाराच संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस गप्प का?
राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समन्वय समितीने आतापर्यंत काय केले हे सांगाव? सरकार लोकांच्या भावनांशी खेळतय असून मराठा समाजाला अध्यादेश काढून दिलेले आरक्षण टिकणार नाही, सरकारमधे अनेक जाणकार लोक आहेत. त्यांनी याची दखल घ्यावी. अन्यथा ही पुन्हा मराठा समाजाची फसवणूक ठरेल, शाहू महाराजांनी जी भूमिका घेतली ती महत्वाची, संपुर्ण बहुजन समाजाला मदत झाली पाहिजे, माझ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणबाबत दोन टक्के अधिक माहिती आहे. मग गेले दीड वर्ष तुम्ही गप्प का बसलात? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज