संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच, या निवडणुकीचे रणशिंग महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून फुंकले जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 जानेवारी रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. नड्डा यांच्या या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वच महत्वाचे नेते उपस्थित राहतील. विशेष म्हणजे […]
नागपूर : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या […]
औरंगाबादः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरले आहे. त्यावरून ते अडचणीत सापडले आहेत. त्यात आता मुलीच्या टीईटी घोटाळ्याप्रकरणात सत्तारांवर नवीन संकट आले आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणात माहिती अधिकारात सत्तारांच्या मुलींबाबत नवीन माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नावेही […]
नांदेड : संभाजीराजे छत्रपती यांनी स्थानिक प्रश्नांसोबतच विधानसभेत होत असलेल्या गदारोळाविषयी भाष्य करताना सरकारसह विरोधकांवर निशाना साधला. शुक्रवारी शेतकरी दिन असून देखील शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचे भाष्य संभाजीराजे छत्रपती महाराजांनी केले. हिवाळी अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी असल्याची जोरदार टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या स्वराज्य संकल्प अभियानाच्या दोन दिवसीय नांदेड […]
बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळण औरंगपूर ग्रामपंचायत निवडणुकीत, अवघ्या 21 वर्षाची तरुणी सरपंच पदी विराजमान झालीय. भारती मिसाळ असं या तरुणीचे नाव असून बारामतीत कृषी पदवीचं ती शिक्षण घेत आहे. 684 मताधिक्यानं ती निवडून आली असून आज गावात तिची मिरवणूक काढून गावच्या लेकीचं कौतुक करण्यात आले. यंदा झालेली ग्रामपंचायत निवडणुक नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. […]
नागपूर : ‘टीईटी’ घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात […]