अहमदनगरनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार, विधानसभेत सरकारची मोठी घोषणा

अहमदनगरनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार, विधानसभेत सरकारची मोठी घोषणा

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठी घोषणा केली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) शहराचे नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली आहे.

इस्लापूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येणार असं विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले. यासाठी मंत्रिमंडळांची मान्यता मिळाली असून आता याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचीही माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली आहे.

विधानसभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मागील काही दिवसांपासून इस्लामपूरचे नाव बदल्याची मागणी सुरु होती. 40-50 वर्षांपासून चर्चेत असलेल्या इस्लामपूरचे नाव देखील ईश्वरपूर होण्याची शासनस्तरावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात होती. आरएसएसचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे अशी मागणी चार-पाच दशकांपूर्वी करण्यात आली होती. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर 1986 मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी इस्लामपूरचा उल्लेख ईश्वरपूर केला होता. अशी माहिती देखील विधानसभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

तसेच इस्लामपूरच्या नामांतरबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. नामांतराचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसेभेत दिली आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यास राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती.

विधानभवनातला ‘पास घोटाळा’! 5 ते 10 हजारांमध्ये प्रवेश, आमदारांनी रेट कार्ड आणि ठिकाणही सांगितलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube