Nitesh Rane : राज ठाकरेंनी सांगितलेलं खरंय, जो माणूस वडिलांना धमकी…

Nitesh Rane : राज ठाकरेंनी सांगितलेलं खरंय, जो माणूस वडिलांना धमकी…

मुंबई : राज ठाकरेंनी जे सांगितलंय ते सत्यच असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती पण बाळासाहेबांचा नाईलाज झाला म्हणूनच त्यांना राज ठाकरेंना माझ्याकडं आणू नका असं सांगितलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

फडणवीसांबरोबर पुन्हा युती करणार का ? ; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात स्पष्टच सांगितले

आमदार राणे म्हणाले, उद्धव ठाकरे हा माणूस कसा आहे हे आख्या महाराष्ट्राला कळू द्या. शिवसेना संपवण्याचं कारण उद्धव ठाकरेच आहेत. भविष्यात कधीतरी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि नारायण राणेंना एकाच व्यासपीठावर बोलवून विचारा उद्धव ठाकरे कसे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी कोणीही सहानुभूती दाखवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

मराठी माणूस अन् शिवसेनेशी खरी गद्दारी कुणी केली असेल तर ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी केली असून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनासुद्धा धमक्या दिल्या असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

वीस वर्षे झाली राज लालबुंदच : उद्धव आणि शिवसेनेवरचा राग जाईना

राज ठाकरे काय म्हणाले :
राणे पक्ष सोडणार समजल्यानंतर मी त्यांना फोन करुन शिवसेना सोडू नका असं सांगितलं. तेव्हा मलाच सोडायची नसल्याचं राणेंनी मला सांगितलं होतं. तेव्हा माझं बाळासाहेबांनी मला सांगितलं की राणेंना घेऊन ये. थोड्याच वेळात पुन्हा बाळासाहेबांचा फोन आला की नको आणूस. तेव्हा त्यांच्या मागून कोणीतही बोलत होतं हे माझ्या लक्षात येत होतं.

दरम्यान, आज विधीमंडळाच्या गेटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आले. त्यावर राणे म्हणाले ठाकरे आजारी असल्याने फडणवीसांनी त्यांना साथ दिलीय. एकच गेट आहे त्यामुळे फोटो काढला त्यामध्ये एवढं विशेष काय? असंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube