Video: आता प्लंबर नाही, वॉटर इंजिनिअर; शहरांची नावं बदलल्यानंतर राज्य सरकार मजुरांसाठी मैदानात

  • Written By: Published:
Video: आता प्लंबर नाही, वॉटर इंजिनिअर; शहरांची नावं बदलल्यानंतर राज्य सरकार मजुरांसाठी मैदानात

Maharashtra Government Planning To Change Pluber Name As Water Engineer : राज्यातल विविध शहरांची नावं बदलल्यानंतर आता राज्य सरकार मजुरांना नवी ओळख मिळावी यासाठी मैदानात उतरले आहे. याचाच एक भाग म्हणून घरी प्लंबिंगची कामे करायला येणाऱ्या प्लंबरला येथून पुढे प्लंबर नव्हे तर, वॉटर इंजिनिअर असे संबोधले जाणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून हालचाली करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आरबीआयचा नवा नियम; १८ कॅरेटचं सोनं गहाण ठेवलं तरी त्याचं मूल्य २२ कॅरेट… वाचा सविस्तर

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाण्याची शक्यता असून, त्याचाच एक भाग म्हणून प्लंबिंगची कामे करणाऱ्या मजुरांना भविष्यात प्लंबरऐवजी वॉटर इंजिनिअर असे संबोधले जाण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे लोढा यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांशी (Devendra Fadnavis) चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही लोढा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही नावात बदल केला जाणार असल्याचेही लोढा म्हणाले.

टेन्शनचं संपलं राव! WhatsApp वर येणार ‘Log Out’ फीचर; सतत येणाऱ्या मेसेजमधून मिळणार ‘ब्रेक’

नाव बदलल्यास सन्मान मिळेल

लोढा म्हणाले की, यापूर्वी जे नामांतर झाले त्यात महाराष्ट्रातील थोर, नामांकित तसेच देशातील प्रसिद्ध वैज्ञानिकांचा समावेश आहे. हे केलेले नामांतर नागरिकांना चांगले वाटल्याचे लोढा म्हणाले. भारतात मजुरांना सन्मान नसल्याचे लक्षात आले आहे. या कामगारांनादेखील सन्मान मिळावा त्यांचा दर्जा सुधारावा आणि त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना प्लंबरऐवजी जर वॉटर इंजिनीअर संबोधले जावे असे आमचा मानस आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करून जी पारंपरिक नावे आहेत ती बदलण्याचा प्रयत्न आहे. प्लंबरचं नाव बदलून वॉटर इंजिनिअर असे केल्यास त्यांना समाजामध्ये सन्मान मिळेल असे आम्हाला वाटते. सध्या यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर निर्णय घेतला जाईल असे लोढा यांनी यावेळी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube