अनेकांना दिलासा, ‘या’ दिवशी सुरू होणार समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) शेवटचा टप्पा सुरु करण्याबाबात राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी इगतपुरी (Igatpuri) येथे होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे. यापूर्वी लोकार्पण सोहळा भिवंडी तालुक्यातील आमणे येथे होणार होता मात्र आता लोकार्पण सोहळा इगतपुरी येथे होणार आहे.
5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. त्यापैकी 652 किमी लांबीचा महामार्ग सुरु करण्यात आला आहे.
तर आता या महामार्गाचा शेवटच्या 76 किमीचा लांबीचा टप्पा 5 जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. ज्यामुळे आता नागपूर ते मुंबई प्रवास फक्त आठ तासांत पूर्ण होणार आहे. यापूर्वी हा लोकार्पण सोहळा फेब्रुवारीमध्ये होणार होता मात्र त्यानंतर यासाठी 1 मे ही तारीख निवडण्यात आली होती. तर आता 5 जून ही तारीख निवडण्यात आली आहे.
तर दुसरीकडे 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते समुद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं होतं. 520 किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी असा तो टप्पा होता. यानंतर 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महामार्गच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं होतं. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा 80 किमीचा मार्ग होता. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील 701 किमीचा एक महत्वाचा प्रकल्प आहे. हा 6 पदरी महामार्ग मुंबईला मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडतो.
राहुरीच्या सहकारी साखर कारखान्यात तनपुरे गटाने मारली बाजी; सर्व 21 जागांवर दणदणीत विजय