Pankaja Munde : नुसत्या घोषणा नको, आरक्षणासाठी अभ्यासगट नियुक्त करा

Pankaja Munde : नुसत्या घोषणा नको, आरक्षणासाठी अभ्यासगट नियुक्त करा

Pankaja Munde : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून (Maratha Reservation) निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलं आहे. त्यांच्या या आश्वासनावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाष्य केले.

शिवशक्ती यात्रा परिक्रमा यात्रेदरम्यान आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) सांगलीत होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कुणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. तर संवैधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागेल. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य आकडे ठरवले गेले पाहिजेत.

‘ओबीसी एक आग, आगीत पडूच नका’; नाना पटोलेंचा सरकारला सल्ला

शिंदे काय म्हणाले होते ?

मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन कटीबद्ध आहे. पण, काही मंडळी दिशाभूल करत आहेत. मराठा समाज आणि ओबीसी बांधवांत मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे हे दु्र्दैवी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी म्हणून 12 आणि 13 टक्के आरक्षण दिले होते. ओबीसी बांधवांवर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे.

.. तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार – जरांगे

सरकारने जीआर काढला, त्यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील’ असं म्हंटलं आहे. पण यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी असतील’ हे तीन शब्द काढून टाका आणि ‘सरसकट मराठा समाजाला’ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी त्यात दुरुस्ती करा, अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर केली.

Ahmedngar MIDC च्या मुद्द्यावरून रोहित पवारांची विखेंवर खोचक टीका

सरकारने काल एक निर्णय घेतला. यानुसार, ज्यांच्याकडे वंशावळ आहे त्यांना आजपासून कुणबी (Maratha Reservation) प्रमाणपत्र देतो, असे सांगितले आहे. यातून आपल्या मागण्यांपैकी एक महत्वाची मागणी मान्य झाली आहे. पण आमची मुख्य मागणी आहे की, सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही आहे. कारण आमच्याकडे कोणाकडेही वंशावळीच्या नोंदी असलेल्या पुरावे नाहीत. त्यामुळे याचा आम्हाला एक टक्काही फायदा होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे वंशावळ आहे त्याला सरकारकडे कशाला जावे लागेल, तो तहसिलदार ऑफिसला जाऊन जात प्रमाणपत्र काढेल. त्यासाठी जीआरची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube