“पवार साहेब तुमचं आडनाव फडणवीस असतं तर तुृम्हालाही कुणी हुंगलं नसतं” सदाभाऊंचा हल्लाबोल

“पवार साहेब तुमचं आडनाव फडणवीस असतं तर तुृम्हालाही कुणी हुंगलं नसतं” सदाभाऊंचा हल्लाबोल

Sadabhau Khot Criticized Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांची भाषणाची (Sadabhau Khot) रांगडी शैली सगळ्यांनाच ठाऊक आहे. सदाभाऊ एकदा का भाषणाला उभे राहिले तर विरोधकांवर अक्षरशः तुटून पडतात. मग समोर कुणीही असो. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि खुद्द शरद पवार यांच्यावर त्याचा राग दिसतो. आताही सदाभाऊंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत शरद पवार यांच्यावर (Sharad Pawar) घणाघाती टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. पवार साहेब तुमची जात वेगळी असती, तुमचेही आडनाव फडणवीस असतेतर तुम्हालाही कुणी हुंगले नसते. मागील सत्तर वर्षांच्या राजकारणात महाराष्ट्रात मूठभर सरदारांचे राज्य होते. या सरदारांना कचाकचा पायाखाली तुडवणारे देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार फडणवीसांनी उलथून टाकलं. त्यामुळेच शरद पवारांना त्यांची जात काढावी लागली. पवार साहेब तुमची जात वेगळी असती आणि तुमचेही आडनाव जर फडणवीस असते (Devendra Fadnavis) तर तुम्हालाही कुणी हुंगले नसते, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

Sadabhau Khot: ’80 कोटी लोक ऐतखाऊ, रेशन बंद करा; नाहीतर हा देश भिकाऱ्यांचा’ खोतांचे वादग्रस्त विधान

आम्ही सर्व घटक पक्ष भाजपसोबत आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी आमचा लढा आहे. आम्हाला काय मिळणार यापेक्षा शेतकऱ्यांना काय देणार हे आमच्यासाठी जास्त महत्वाचे आहे. तीच आमची भूमिका होती. आता येत्या 27 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Narendra Modi) कोल्हापुरात सभा होणार आहे. देशातील जनता पुन्हा एकदा मोदींच्याच पाठिशी उभी राहिल. यंदाची लढाई ही भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना सोबत घेऊन चालतात. त्यामुळे इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) या लुटारूंना महायुती मूठमाती देईल असे सदाभाऊ खोत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज