हिंदू मुलींच्या संरक्षणार्थ नितेश राणे धावले, उंबरे धर्मांतर प्रकरणी उद्या राहुरीत जनआक्रोश मोर्चा…

हिंदू मुलींच्या संरक्षणार्थ नितेश राणे धावले, उंबरे धर्मांतर प्रकरणी उद्या राहुरीत जनआक्रोश मोर्चा…

अहमदनगर – जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) आणि धर्मांतराची (Conversion) काही प्रकरणे समोर आली. उंबरे गावातही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण थेट अधिवेशनात चर्चेचा मुद्दा झाला. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान याच दोन मुद्द्यावरून उद्या (05 ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील राहुरीमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाला मोठ्या संख्यने नागरिकांनी तसेच सर्व पक्षांनी उपस्थित राहावे. हा कोणत्याही पक्षाचा मोर्चा नसल्याने कोणीही आपल्या पक्षांचे झेंडे न घेऊन येता यामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले आहे. (Participate Hindu Janakrosh Morcha in Rahuri a Appeal to MLA Nitesh Rane)

गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आली आहे. सातत्याने खून, दरोडा, हत्याकांड या घटना सुरु असताना यातच भरात भर म्हणून आता लव्ह जिहाद तसेच धर्मांतराच्या घटनांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. नुकतेच राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात घडलेलं धर्मांतराचे प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती.

Kishor Kumar Birth Anniversary : ‘तुम ही मेरी जीवन नैया…’ जेव्हा किशोर कुमारांनी लता दीदींना लिहिले पत्र 

अश्या प्रकरणामध्ये सात्यत्याने वाढ होऊ लागली आहे. या घटनांना कोठेतरी आळा बसावा यासाठी सरकारने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरण विरोधात कठोर कायदा करावा. दरम्यान याच महत्वाच्या मागणीसाठी शनिवारी (ता.05ऑगस्ट) रोजी सकाळी राहुरीच्या वायएमसीए ग्राउंडवरून भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.

आमदार राणेंचे महत्वाचे आवाहन
राहुरीच्या वायएमसीए ग्राउंडवर उद्या 5 ऑगस्ट रोजी ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर प्रकरणी हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी आपल्या सगळ्यांना जमा व्हायचे आहे. हा काही कोणत्या पक्षाचा मोर्चा नाही आहे. कुठला आमदार व खासदार म्हणून आपण त्या ठिकाणी जमा व्हायचं नाही आहे. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा या ठिकाणी घेऊन येऊ नये, असे आवाहन देखील यावेळी नितेश राणे यांनी व्हिडीओ मेसेजद्वारे नागरिकांना तसेच कार्यकर्त्यांना केले आहे.

राहुरीत घडला होता धर्मांतराचा प्रकार
तालुक्यातील उंबरे येथे क्लासच्या नावाखाली धर्मांतराचे रॅकेट चालवल्याचे उघडकीस आले. अल्पवयीन हिंदू मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न चालू होता. तसेच हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून धमकावले देखील जात होते. मात्र पीडित मुलीनी स्वतः पुढे येत हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube