शिवाजी महाराजांच्या समाधीलगत वाघ्या कुत्र्याची समाधी हे अतिक्रमणच… ते हटवा; संभाजीराजे छत्रपतींचे सीएमला पत्र

  • Written By: Published:
शिवाजी महाराजांच्या समाधीलगत वाघ्या कुत्र्याची समाधी हे अतिक्रमणच… ते हटवा; संभाजीराजे छत्रपतींचे सीएमला पत्र

Yuvraj Sambhaji Chhatrapati letter to Cm Devendra Fadanvis: हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड (raigad) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. हे अतिक्रमण आहे. त्यामुळे ते हटवावे, अशी मागणी माजी खासदार व रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Chhatrapati) यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र पाठविले आहे.

‘पुरावे असतील, तरच धनंजय मुंडेंवर कारवाई होईल…’ देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे, असे पत्रात संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

तरूणाई गुन्हेगारीकडे वळतेय…आम्ही राजकीय लोकं भर घालतोय; दिलीप वळसे पाटलांची कबुली

समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरुपी हटविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


शंभर वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच हटवा

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस शंभर वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube