Amol Kolhe : वसुलीशिवाय जागा सोडायची नाही; मुंबई वाहतूक पोलिसांच्या अनुभवानंतर कोल्हेंचा सरकारवर निशाणा

Amol Kolhe  : वसुलीशिवाय जागा सोडायची नाही;  मुंबई वाहतूक पोलिसांच्या अनुभवानंतर कोल्हेंचा सरकारवर निशाणा

Amol Kolhe : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी मुंबईत वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांबाबतचा त्यांना आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. याबाबत त्यांनी राज्यसरकारच्या धोरणावर टीका केली आहे. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडीयावर एक पोस्ट केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? असं कॅप्शन देत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

Sharad Pawar : इडीने किती मजले ताब्यात घेतले? हे पण लिहा; पटेलांच्या पुस्तकासाठी पवारांनी सुचवला ‘चॅप्टर’

अमोल कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

हे प्रकरण असं की, अमोल कोल्हे हे मुंबईतून बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांना सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी अडवलं. त्यावेळी त्यांना एक धक्कादायक अनुभाव आल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत ते म्हणाले की, ‘आजचा धक्कादायक अनुभव, मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे? याची माहिती घेतली. तेव्हा त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मॅसेज दाखवला. त्या मॅसेजमध्ये म्हटलेलं होतं की, प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे! त्यामुळे या महिला पोलिसासारखे सर्व कर्मचारी ही वसुली करत आहेत. असं कोल्हे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय?
त्यामुळे संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा करावा. वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का? याची जनतेला माहिती मिळेल! अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे. तर त्यांनी यावेळी या पोस्टला ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? असं हॅशटॅग देत सरकारवर टीका केली आहे.

अजितदादांच्या बोलण्यात सत्यता नाही; काऊंटर फायर करत पवारांनी फेटाळले सर्व दावे

तसेच पुढे कोल्हे असंही म्हणाले की, मी त्या पोलीस भगीनीचे नाव सांगणार नाही. कारण अत्यंत विश्वासाने त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. पण त्या देखील म्हणाल्या की, हे अवघड आहे. तसेच एवढी वसूली झाल्याशिवाय जागा सोडायची नाही. अशा आम्हाला सूचना आहेत. असं ही महिला म्हणाली. त्यामुळे हे आदेश नेमके कोणी दिले ? असं म्हणत त्यांनी गृहखात देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारित असल्याने त्यांना टॅग केले आहे. असं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube