…म्हणून अमृतपालच्या वकिलाला उच्च न्यायालयाने फटकारलं!

…म्हणून अमृतपालच्या वकिलाला उच्च न्यायालयाने फटकारलं!

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला उच्च न्यायालयाकडून दुसरा झटका बसला आहे. अमृतपाल सिंगचे वकिल इमानसिंग खारा यांना उच्च न्यायालयाने फटकारलंय. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगचा साथीदार बाजेके यांच्यावर एनएसए लागू करण्यात आला असताना बंदीशपथ कशाच्या आधारे दाखल केलंय? या शब्दांत न्यायालयाकडून फटकारण्यात आलंय.

काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याच्या मुलाचा भाजपात प्रवेश

तसेच आसाम जेलच्या लेडी सुपरिटेंडेंटला नेमक्या कोणत्या आधारावर पक्षकार करण्यात आले आहे? वकिलाला मुलभूत कायदाही माहीत नाही का? असंही न्यायालयाने म्हटलं आहे. बाजेके दिब्रुगड तुरुंगात असून त्याला भेटायचे असल्याचं वकिलाने बचावात सांगितले होतं. त्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितले की, ते दुसऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांकडे गेले.

परदेशातून दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीची चर्चा; शरद पवारांचं केंद्रीय दुग्धमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

तुम्ही आसाम उच्च न्यायालयात का गेला नाही? उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या याचिकेचे कारण योग्य नाही. आता या प्रकरणाची सुनावणी अमृतपाल प्रकरणासोबतच ११ एप्रिलला होणार आहे. ज्या प्रकरणात हेबियस कॉर्पस दाखल केला जातो, तेव्हा आरोपी पोलिसांनी पकडला होता परंतु अटक दाखवत नाही आणि कुटुंबातील सदस्यांना त्याची माहिती नसते. या प्रकरणी बाजकेला दिब्रुगड कारागृहात पाठवल्याची माहिती सर्वांना होती.

Navneet Kaur Rana : जेलमधल्या आठवणी सांगताना रडल्या, पण महविकास आघाडीला दिले नवे आव्हान

तर दुसरीकडे, अमृतपाल सिंगने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये 13 एप्रिलला सरबत खालसा बोलवण्यात येणार असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, जथेदारांनी बैसाखीनिमित्त कार्यक्रम जाहीर करून त्यावरही अंकुश ठेवला आहे. 12-13 एप्रिल रोजी श्री दमदमा साहिब तलवंडी साबो येथे खालसा सजना दिवस आणि बैसाखीला समर्पित गुरुमती समागम आयोजित करण्यास जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह यांनी सांगितले आहे.

भाजपकडूनच दंगली भडकवण्याचा प्रयत्न ; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

या घोषणेमुळे अमृतपाल सिंगच्या मागणीनुसार 13 एप्रिल रोजी सरबत खालसा आयोजित करण्याबाबतच्या अटकळांना काही प्रमाणात आळा बसला आहे. दरम्यान, वारिस पंजाब देच्या कायदेशीर सल्लागाराने हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये अमृतपालसह आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात आलेल्या पंतप्रधान बाजेकेचे नावही होते. आज या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube