Video : ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जींवर हल्ला, अंडे फेकले कपडे फाटले चोर-चोरच्या घोषणा…

Attack on TMC's Abhishek Banerjee यांना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे संतप्त नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले.

Attack On TMC's Abhishek Banerjee

Attack on TMC’s Abhishek Banerjee, eggs thrown at him, slogans of thieves and thieves : पश्चिम बंगालच्या राजकारणात सत्ताबदलानंतर तृणमूल काँग्रेस टीएमसी (TMC) नेतृत्वाच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे संतप्त नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी ते येथे पोहोचले असता परिस्थिती अचानक चिघळली आणि त्यांच्या ताफ्याभोवती मोठी गर्दी जमा झाली.

Nashik MLC Election: संकटमोचक गिरीश महाजन अडकले कात्रीत ! निकटवर्तीय दोघांनी शड्डू ठोकला

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्थानिक नागरिक आणि महिलांनी अभिषेक बॅनर्जी यांना घेराव घालत टीएमसीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काहींनी कथित भ्रष्टाचार आणि मागील कारभारावर टीका करत “चोर-चोर”च्या घोषणा दिल्या. विरोधाचे स्वर वाढताच वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.

अंडीफेक आणि धक्काबुक्की

सुरुवातीला घोषणाबाजीपुरता मर्यादित असलेला विरोध काही वेळातच उग्र झाला. जमावातील काहींनी अभिषेक बॅनर्जी यांच्या दिशेने अंडी फेकल्याचा आरोप आहे. तसेच सुरक्षाव्यवस्था भेदून काही आंदोलक त्यांच्या जवळ पोहोचल्याने धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात त्यांच्या कपड्यांचेही नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी आरोप केला की, अनेक वर्षे हिंसाचार आणि विविध समस्यांचा सामना करत असताना त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता राजकीय परिस्थिती बदलल्यानंतरच नेते मंडळी येथे येत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

सुरक्षेसाठी हेल्मेटचा आधार

घटनास्थळी तणाव वाढताच सुरक्षारक्षक आणि पोलिसांची धावपळ उडाली. जमावाकडून वस्तू फेकल्या जात असल्याने अभिषेक बॅनर्जी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढताना सुरक्षारक्षकांनी त्यांच्या डोक्याचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेट घालून दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजपवर आरोप

घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी या प्रकारामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वारंवार माहिती देऊनही पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला.

बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा

सोनारपूरमधील या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील बदलत्या राजकीय वातावरणाची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, राज्यातील काही भागांमध्ये नागरिकांमधील नाराजी आता उघडपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे टीएमसीसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सोनारपूर आणि आसपासच्या परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us