भारताची लढाऊ विमाने पाडण्यात आली? दावा खोटा, सीडीएस अनिल चौहानने फाडला पाकिस्तानचा बुरखा

CDS Anil Chauhan : ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान पाकिस्तानने भारताचे सहा लढाऊ विमाने पाडले असल्याचा दावा पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्याकडून करण्यात येत होता मात्र आता भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान (CDS Anil Chauhan) यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी अमेरिकन वृत्तवाहिनी ब्लूमबर्गला (Bloomberg) दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. सीडीएस अनिल चौहान शांग्री-ला (Shangri-La) संवादात सहभागी होण्यासाठी सिंगापूरात दाखल झाले आहे. या मुलाखतीमध्ये सीडीएस अनिल चौहान यांनी पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे असं म्हटलं आहे. याचबरोबर या मुलाखतीमध्ये त्यांनी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान भारतीय विमानांचे नुकसान झाल्याचे मान्य केले परंतु किती नुकसान झाले याबाबात कोणतीही माहिती दिलेली नाही.
यावेळी सीडीएस अनिल चौहान म्हणाले की, विमानांचे किती नुकसान झाले हे महत्वाचे नाही पण विमानांते नुकसान का झाले हे शोधणे अधिक महत्वाचे आहे. जेणेकरुन भविष्यात सैन्य आपली रणनीती सुधारु शकेल आणि नंतर प्रत्युत्तर देऊ शकेल.
सीडीएस अनिल चौहान पुढे म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे की, आम्हाला आमच्या चुका समजल्या आणि आम्ही चुका दुरुस्त केल्या आणि नंतर दोन दिवसांनी त्या अंमलात आणल्या. त्यानंतर आम्ही आमची सगळी विमाने उडवली आणि दूरवरच्या ठिकाणांनावर लक्ष्य केलं असं या मुलाखतीमध्ये सीडीएस अनिल चौहान म्हणाले.
India’s military confirmed for the first time that it lost an unspecified number of fighter jets in clashes with Pakistan in May.
Anil Chauhan, chief of defense staff of the Indian Armed Forces, spoke to Bloomberg TV on Saturday, while attending the Shangri-La Dialogue in… pic.twitter.com/9y3GW6WJfn
— Bloomberg TV (@BloombergTV) May 31, 2025
फेक न्युजला प्रत्युत्तर दिले
शांग्री-ला संवादादरम्यान सीडीएस अनिल चौहान म्हणाले की आम्ही फेक न्युजला तोंड देण्यासाठी सतत प्रयत्न केले. सशस्त्र दलांचा 15% वेळ त्या खोट्या बातम्यांना तोंड देण्यासाठी गेला. तसेच भारताने नेहमीच आपले नॅरेटिव्ह भक्कम आधारावर बनवले आहे.
Mahadev Jankar Exclusive : मी एनडीएची साथ केव्हाच सोडली…. जानकर यांची अधिकृत घोषणा
26 पर्यटकांचा मृत्यू
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 6 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते.