Earthquake : भल्या पहाटे लडाखमध्ये जमीन हादरली; जोरदार भूकंपाने नागरिकांची पळापळ

Earthquake : भल्या पहाटे लडाखमध्ये जमीन हादरली; जोरदार भूकंपाने नागरिकांची पळापळ

Earthquake News : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून (Earthquake News) भूकंपाचे सत्र सुरू झाले आहे. भारत, चीन, नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांत मोठे भूकंप झाले त्यानंतर आता पुन्हा एकदा भारताला भूकंपाचा धक्का बसला आहे. आज पहाटेच्या सुमारास लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी नोंदविण्यात आली. जमिनीपासून पाच किलोमीटर खोल या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात कुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Taiwan Earthquake : तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप! घरांची पडझड, नागरिकांची पळापळ

जम्मू काश्मीरजवळी किश्तवाड जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. किश्तवाडमध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदूही जमिनीच्या आत पाच किलोमीटर खोल होता. त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. मात्र तरीही यामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही. मागील काही दिवसांपासून दक्षिण आशियातील अनेक देशांत भूकंपांचे झटके बसत आहेत. भारत, नेपाळ, अफगाणिस्तान, बांग्लादेशनंतर आता भारतात पुन्हा एकदा जमीन हादरली आहे.

भूकंप का होतात?

पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स एकमेकांना आदळल्यास जी ऊर्जा बाहेर पडते त्यालाच भूकंप असे म्हणतात. या प्लेट्स भूगर्भात अत्यंत कमी गतीने सरकत असतात. वर्षाच्या हिशोबात सांगायचे झाले तर या प्लेट्स दरवर्षी त्यांच्या जागेवरून 4 ते 5 मिमी सरकतात. या काळात हालचाली होताना प्लेट्स एकमेकांवर आदळण्याचे प्रकारही घडतात. असे जर झाले तर आपल्याकडे भूकंप येतो, असे तज्ज्ञ सांगतात.

याआधी नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. दिल्ली एनसीआरमध्ये 60 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते असे येथील नागरिकांनी सांगितले. भारतात याआधीही भूकंप झाला. मात्र या भुकंपात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात दोन हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले होते. त्यानंतर आता नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 129 जणांचा मृत्यू झाला होता.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप! 129 जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube