ब्रेकिंग! प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या घरावर अंदाधुंद गोळीबार; अज्ञातांकडून 25 राउंड फायरिंग

Elvish Yadav News : प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या बाबतीत एक धक्कादायक घटना (Elvish Yadav) घडली आहे. एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावर आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी जोरदार (National News) गोळीबार केला. तीन अज्ञात लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी दोन डझनांहून अधिक राऊंड फायरिंग केली. या घरात एल्विश यादव आपल्या परिवारासह राहतो. ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा मात्र एल्विश घरी नव्हता. घरात फक्त त्याची आई आणि केयरटेकर होता. एल्विश सध्या परदेशात आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. एल्विशचे कुटुंबीय पुरते हादरून गेले आहेत.
गुरुग्रामचे पोलीस पीआरओ संदीपकुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की एल्विश यादवच्या घराबाहेर तीन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गोळीबार केला आहे. ही घटना साधारण पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात एक डझनाहून अधिक राउंड फायरिंग झाली. या गोळीबारात कुणी जखमी झाले नसले तरी घराच्या आत भिंती आणि खिडक्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
YouTuber Elvish Yadav : ईडीची मोठी कारवाई, यूट्यूबर एल्विश यादवची मालमत्ता जप्त
VIDEO | Gurugram: YouTuber Elvish Yadav’s father, Ram Avtar Yadav, claims that three miscreants fired around 25–30 rounds at their residence in Gurugram. He says, “The police administration is doing its job well. Our family was present at home when the Firing incident happened. I… pic.twitter.com/4gcWnPOth9
— Press Trust of India (@PTI_News) August 17, 2025
हल्लेखोरांनी 25 ते 30 राउंड गोळ्या चालवल्या असा दावा एल्विशच्या वडिलांनी केला. पोलिसांनी मात्र 10 ते 12 राउंड गोळीबार झाल्याचे सांगितले. गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. तीन लोक दुचाकीवरून आले. यातील दोघांनी गोळीबार केला. फायरिंग घराच्या ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरवर झाली. एल्विश स्वतः तिसऱ्या मजल्यावर राहतो. गोळीबार झाला तेव्हा घरातील सदस्य आणि केयरटेकर घरात होते.
धमकी नाही मग गोळीबार कशासाठी
हल्लेखोर नेमके कुठून आले होते. गोळीबार करून कुठे पसार झाले याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या लोकांनी काही धमकी दिली का याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे अचानक ही घटना कशी घडली असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, एल्विशच्या कुटुंबियांनी आतापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांत दिलेली नाही.