सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवलं

सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवलं

 Indus River water dispute : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये दिसत आहे. येथील (water) पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. सिंधू नदीच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. असंतोष इतका भडकला आहे की, आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्र्याचं घरच पेटवून दिलं आहे. पाकमधील आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसत आहे. या आंदोलनात एक ते दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

पाकड्यांची चोहो बाजूने कोंडी सुरू आहे. एकीकडे सिंधू नदीचे पाणी भारताने अडवले आहे. तर दुसरीकडं सरकारच्या सहा कालवे प्रकल्पाला सिंध प्रांतातील लोकांचा प्रचंड विरोध सुरू आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पाकिस्तानातील सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचं नौशहरो जिल्ह्यातील घर आंदोलकांनी जाळलं. त्यांच्या घराची मोठी नासधूस करण्यात आली. आंदोलकांच्या हाती यावेळी बंदुका होत्या. या बंदुकातून अनेकांनी हवेत गोळीबार केला. आंदोलकांनी यावेळी शेकडो वाहनं पेटवून दिली.

होय, मी पाकिस्तानला माहिती पुरवली; ज्योती अन् गजालाने आपले पत्ते उघडले

राष्ट्रीय महामार्गावर मोरो शहरात गृहमंत्र्याचे घर आहे. याठिकाणी आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकात अगोदर बाचाबाची झाली. पुढे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. मग आंदोलकांनी पोलिसांसह गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला चढवला. पोलिसांची वाहनं पेटवून देण्यात आली आहे. या आंदोलनात, दोन आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर जमाव हिंसक झाला. संतप्त जमावाने पोलिसांची वाहनं जाळली. त्यात एक डीएसपी आणि इतर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

चोलिस्तान कालव्याचा मुद्दा पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेतृत्वातील सिंध सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वादाचा मुद्दा आहे. शाहबाज शरीफ सरकार चोलिस्तानमधील वाळवंटात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयोग राबवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सिंधू नदीवर सहा कालव्याची निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. पण पीपीपी आणि सिंध प्रांतातील राजकीय दल त्याला कडाडून विरोध करत आहेत.

त्यातच भारताने सिंधुचे पाणी अडवल्याने सिंधमध्येच पाण्याचा तुटवडा जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी आंदोलक संतप्त झाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, चोलिस्तान कालवा प्रकल्पासाठी अंदाजे 211.4 अब्ज रुपयांचा खर्च येईल. त्यामाध्यमातून हजारो एकर नापीक जमीन शेतीयोग्य होईल. त्यातून मोठे उत्पन्न घेता येईल. 400,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पण सिंध लोकांसाठी ही पण एक डोकेदुखी ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube