Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपाच्या मनातलं

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपाच्या मनातलं

Karnataka Politics : दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता हस्तगत करत काँग्रेसने (Congress) भाजपाला दक्षिणेतून हद्दपार केले. कर्नाटकात काँग्रेसचे (Karnataka Politics) सरकार येऊन आता सहा महिने होत आले आहेत तरीदेखील भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनातून गेलेली नाही. आता पुन्हा भाजपाच्या राजकीय खेळीची चिंता खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या  (Siddaramaiah) यांनाच सतावू लागली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सिद्धरामय्या म्हणाले, हे खरं आहे की भाजपाचे (BJP) लोक आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना यश मिळणार नाही. याआधी आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यश मिळालं होतं आता मात्र त्यांना यश मिळणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचा एकही आमदार त्यांच्याबरोबर जाणार नाही, असे सिद्धरामय्या यांनी ठणकावून सांगितले.

Road Accident : काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

चार महिन्यांपूर्वीच्या घटनेची आठवण 

दरम्यान, कर्नाटकात याआधी चार महिन्यांपूर्वी एक राजकीय नाट्य घडले होते. राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकूण 20 मंत्री आपली कामे नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसच्या 11 आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली होती. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ते बीआर पाटील यांच्या लेटरहेडवर लिहिले गेले होते. गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर 10 जणांनी पत्रात म्हंटले होते की, आम्ही लोकांच्या विश्वासानुसार काम करू शकत नाही. 20 हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत. मंत्री लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत. ते सहकार्य करत नसल्याने कामे पूर्ण होणार नाहीत.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते स्पष्टीकरण  

सीएम सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी राज्य काँग्रेसमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या आणि अफवांचे खंडन केले होते. व्हायरल झालेल्या पत्रात एकही अधिकारी आमदारांचे ऐकत नसल्याचा आरोप होता. या पत्राबाबत सीएम सिद्धरामय्या म्हणाले होते की, याबाबत तुम्हाला कुणी सांगितले? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला होता. तर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही स्पष्ट केले होते की, आम्ही सर्व मंत्र्यांना सर्व आमदारांना सोबत घेण्यास सांगितले आहे, जे हरले त्यांच्याशी बोला. त्यांचीही कामे करा, असं सांगितलं होतं. प्रत्येकजण आपापली कामे करत आहे. पत्रात जे लिहिलं, तसं काहीही नाही. या फक्त अफवा पसरवल्या जात आहेत.

कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात? 11 असमाधानी आमदारांचा लेटर बॉम्ब; काँग्रेसमध्ये खळबळ

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube