काय सांगता! ‘या’ खास आंब्याची किंमत 3 लाख रुपये किलो; शेतात CCTV अन् सुरक्षारक्षक तैनात

काय सांगता! ‘या’ खास आंब्याची किंमत 3 लाख रुपये किलो; शेतात CCTV अन् सुरक्षारक्षक तैनात

Miyazaki Mango : मानवी आरोग्यात फळांचं महत्व आहे. स्वाद आणि आरोग्याच्या दृष्टीने फळांचं वेगळंच महत्व आहे. आजारी व्यक्तीला तसेच रोजच्या आहारातही फळांचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण, ज्यावेळी जपानच्या मियाजाकी आंब्याची (Miyazaki Mango) चर्चा होते तेव्हा फक्त चवीपुरताच मर्यादीत राहत नाही. या आंब्याची वेगळी ओळखही अधोरेखित होते. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बबियांव गावातील शेतकऱ्याने जपानमधील या आंब्याची शेती केली आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजरात या आंब्याची किंमत 2 ते 3 लाख रुपये प्रति किलोपर्यंत आहे. आंबे चोरीला जाऊ नये म्हणून शेतकरी शैलेंद्र यादव यांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

जपानच्या या आंब्यात असं काय खास आहे याची माहिती जाणून घेऊ या..

स्थानिक मीडियातील माहितीनुसार शैलेंद्र यादव यांनी या आंब्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत. सुरक्षारक्षक चोवीस तास आंब्यांच्या झाडांची निगराणी करत असतात. शेतीच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. इतकी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचं कारण म्हणजे मागील काही वर्षांत देशात अनेक ठिकाणी मियाजाकी आंब्याच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको…किमान 10 जूनपर्यंत पावसात घट

मियाजाकी आंब्यात काय खास

मियाजाकी आंबा लाल रंगाचा असतो. यात पोषक घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच खायलाही अतिशय गोड आहे. या वैशिष्ट्यांमुळे हा आंबा जगभरात प्रसिद्धी पावला आहे. यामध्ये व्हिटामिन ए, सी आणि अन्य महत्वाचे मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत. या आंब्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा उन्हातही पिकतो. यामुळे आंब्याचा स्वाद आणखी वाढतो.

आज तकनुसार शैलेंद्र म्हणतात मी काही दिवसांपूर्वी एका अहवालात मियाजाकी आंब्याची माहिती वाचली होती. यानंतर जपानमधून या आंब्याची रोपे मागवली आणि माझ्या शेतात लावली. आता या झाडांना आंबे लागले आहेत.

देश विदेशातील खरेदीदार आता चौकशी करत आहेत. परंतु, या आंब्याची विक्री लिलावाद्वारे व्हावी असे शैलेंद्र यादव यांना वाटते. वाराणसीत अशी घटना बहुदा प्रथमच घडत असावी की आंब्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी लागली. पण जर हा आंबाच तीन लाख रुपये किलोने विकला जात असेल तर त्यांची सुरक्षितता करणेही महत्वाचेच आहे.

कधी ऊन, कधी पाऊस… बदलत्या हवामानात मुलांची काळजी घेण्यासाठी महत्वाच्या टिप्स

follow us
  • fb
  • instagram
  • youtube