- Letsupp »
- national
देश
-
मोदींना पाठिंबा देणार की देशातील लोकांना? केजरीवालांचा काँग्रेसला खोचक सवाल
Arvind Kejriwal meets Sitaram Yechuri : केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात आणलेला अध्यादेश राज्यसभेत हाणून पाडण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभरात दौरा करत आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यानंतर केजरीवाल यांनी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते सिताराम येचुरी (Sitaram Yechuri) यांची भेट घेतली. यावेळ येचुरी यांनी पार्टी […]
-
‘आता आमची पदके गंगेत टाकणार’; पहिलवानांनी घेतला नवा पवित्रा
Wrestlers Protest : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या पहिलवानांनी आता केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक पाऊल उचलले आहे. पहिलवान आता त्यांना मिळालेली पदके गंगा नदीत विसर्जित करतील आणि आमरण उपोषणास बसतील. याबाबत कुस्तीपटू विनेश फोगाटने ट्विटरवर एक निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, की पहिलवान हरिद्वारला जातील आणि सायंकाळी 6 वाजता पदक गंगा नदीत विसर्जित करतील. […]
-
PMJDY : मोदी सरकारला दणका! 49 कोटी खाते उघडले पण, चालू खात्यांची संख्या ‘इतकी’ घटली
PMJDY : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला 26 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त भाजप केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान चालवत आहे. या योजनांनमध्ये जनधन योजना (PMJDY) अत्यंत महत्वाची मानली जाते. मोदी जेव्हा 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले त्यावेळी 15 ऑगस्टला त्यांनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. […]
-
गेहलोत-पायलट वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींची यशस्वी मध्यस्थी; राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये मोठा निर्णय
राजस्थान काँग्रेसमध्ये (Congress) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला गेहलोत-पायलट वादावर अखेर पडदा पडला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) या 2 नेत्यांमधील वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी यशस्वी मध्यस्थी केली असून पुढील निवडणुका एकजुटीने लढविण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. वसुंधरा राजे सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास […]
-
Accident : बस-कारचा भीषण अपघात; 2 चिमुरड्यांसह 10 जणांचा भीषण अपघात
Mysuru : कर्नाटकातील म्हैसूरजवळ झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्यांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी सांगितले की, तिरुमाकुडलू-नरसीपूरजवळ खासगी बस आणि कारची धडक झाली. कारमधील एक व्यक्ती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 मोठ्या घोषणा, अजूनही अपूर्ण
Modi government announcement : दिल्लीतील मोदी सरकारला नुकतीच नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. त्यावर्षी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदीच्या त्सुनामीने विरोधी पक्षांची धुळधाण झाली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर […]









