कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते… दानवेंचा राज ठाकरेंना टोला

  • Written By: Published:
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते… दानवेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : काल ठाण्यात महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे त्यांचावर टीका केली ते म्हणाले होतेकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नादाला लागले म्हणून मुख्यमंत्री पद गेलं. राज ठाकरेंच्या या टीकेला प्रतिउत्तर देत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ तसेच ते पुढे म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला पक्ष आहे.

राज ठाकरेंच्या व्हिडिओ दाखवण्यावरून देखील यावेळी दानवे बोलले की त्यांनी आगोदर त्यांचे सर्व जुने व्हिडिओ एकत्र करून पाहावे मग त्यांच्या लक्षात येईल की ते कोना बद्दल काय -काय बोलले आहेत.

रामदास कदमांना धक्का, बंधू सदानंद कदम यांना ईडीकडून अटक 

दानवे यांनी पुढे मनसे आणि भाजप वर सडकून टीका केली ते म्हणाले. मनसे हा पक्ष कधीच कोणाचा नव्हता आणि होणार देखील नाही. ते आज ज्यांच्या सोबत आहेत त्यांनी त्यांच्यावर देखील काल टीका केली. त्यांचा जसा मूड असेल तसे ते वेगवेगळ्या पक्षावर टीका करतात आणि त्यांच्या सोबत मैत्री देखील करतात. त्यामुळे महाराष्ट नवनिर्माण सेना या पक्षाचा कधीच कोणी विश्वास करू शकत नाही.

Mask: अलर्ट! मास्क वापरा अन्यथा; ‘या’ रुग्णसंख्येत मोठी वाढ

पुढे बोलताना दानवे म्हणाले…कसबा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपला खुले समर्थन दिले हे काय वेगळं सांगायला हवं भाजप आणि मनसे एकचं आहेत. आणि हे जितके एक होतील तितकी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मजबूत आणि खंबीर होईल.

पत्रकाराने राज ठाकरेंच्या अयोध्याला जाण्यावरून प्रश्न विचारला त्यावर दानवे म्हणाले त्यांना अयोध्येला जाण्यासाठी भाजपनेच विरोध केला. भाजप त्यांना कायम विरोध करत आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube