सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शेलारांचा पलटवार

सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शेलारांचा पलटवार

मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर (Narendra Modi degree) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपला नामषेश करू असं वक्तव्या केलं होत. त्यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरेंवा भाजपला नामशेष करायचंय म्हणजे काय? पंतप्रधान मोदींना नामशेष करायचंय की, देवेंद्र फडणवीसांना. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा प्रयत्न करूल तसे करण्याचा प्रयत्न केला देखील. पण तुम्हाला ते जमूच शकत नाही. तुमच्यात तेवढ बळच नाही. पण या घटनांमध्ये तुमचं औरंगजेबी स्वप्न दिसतयं. अशी टीका आशिष शेलार यांनी केला आहे.

गृहविभाग कोणाच्या दबावाखाली चालतो? आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांवर ताशेरे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube