Deepak Kesarkar : शरद पवारांकडून शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न, शिंदे गटाचा गंभीर आरोप

Deepak Kesarkar : शरद पवारांकडून शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न, शिंदे गटाचा गंभीर आरोप

Deepak Kesarkar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून (mahayuti) राज्यातील 45 लोकसभा जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतील नेते उमेदवारांसाठी अनेक प्रचार सभा, पत्रकार परिषद घेताना दिसत आहे. आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले असल्याचे गंभीर आरोप केला आहे.  या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीतर्फे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महायुतीचे समन्वयक आ.प्रसाद लाड, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

शिवसैनिकांनी पवारांच्या भुलथापांना बळी पडू नये

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात अनेक बेताल आरोप केले मात्र बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असणार्‍या शिवसैनिकांनी वस्तुस्थिती जाणून शिवसैनिकांनी पवारांच्या भुलथापांना बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केला.

शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेत फूट पाडली, हे जगजाहीर आहे. 2014 नंतर ही अनेक घडामोडीत पवार यांनी शिवसेनेसारखी लढाऊ संघटना कशी संपेल, या दृष्टीनेच प्रयत्न केले. यावेळी केसरकर यांनी गेल्या 10 वर्षातील अनेक राजकीय घडामोडी वेळी पडद्यामागे घडलेल्या घटनांचा संदर्भ देत पवार यांचा शिवसेनेबद्दलचा आकस, द्वेष दाखवून दिला.

तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाला नव्हता हे पाहून शरद पवार यांनी भाजपला न मागता पाठिंबा जाहीर केला, पुन्हा भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नये या इच्छेमुळेच भाजपाला बिनशर्त पाठिंबा त्यांनी जाहीर केला, असं देखील त्यांनी नमूद केले.

2017 मध्ये जेव्हा भाजप आणि  राष्ट्रवादी एकत्र येण्याची तयारी करत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेबरोबर असलेली युती कायम राहिली पाहिजे अशी भूमिका घेतली होती तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना बरोबर असेल तर आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही असं भाजपा नेतृत्वाला कळवले होते, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते या घडामोडींचे साक्षीदार आहेत, असे  केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान 2019 शरद पवार भाजपबरोबर जाणार होते मात्र वाटाघाटी फिसकटल्याने त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला साथीला घेत सरकार बनवले.  शिवसेना संपल्याखेरीज राष्ट्रवादी वाढणार नाही, असा पवार यांचा समज असल्याने त्यांनी नेहमीच शिवसेनेचे पाय ओढण्याचे राजकारण केले.

आता याच पवारांनी राजकीय स्वार्थासाठी भाजपा विरोधात अपप्रचार सुरू केला आहे. यामुळे महायुतीकडून दर दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन माविआ नेत्यांची पोलखोल केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज