मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात; पटोलेंचा घणाघात

  • Written By: Published:
मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात; पटोलेंचा घणाघात

Nana Patole : महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे उद्योग मागील दीड वर्षापासून सातत्याने सुरू आहेत. वेदांत-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. सध्याचे भाजप सरकार मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

Tiger 3: ‘लेके प्रभु का नाम’ गाण्याच्या यशाने सलमान भारावला; खास पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार 

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, गेल्या दीड वर्षात राज्यातील भाजप सरकार दिल्लीच्या सांगण्यावरून महाराष्ट्राची लूट करत आहे. सुरतमध्ये एक मोठा हिरा उद्योग उभारला जात आहे, त्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईतील हिरे- उद्योगही सुरतला नेण्यासाठी तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही मार्गी लागावे यासाठी मोदी आले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प हा महाराष्ट्रावर मोठे ओझे आहे. पण, मोदी-शहांसमोर शिंदे-फडणवीस-पवार काहीही बोलू शकत नाहीत. भाजपने मुंबई व महाराष्ट्रातील उद्योग, महत्त्वाची कार्यालये, संस्था मुंबई, महाराष्ट्राबाहेर घेऊन जाण्याचा सपाटा लावला आहे. राज्याला रसातळाला नेण्याचे पाप भाजप सरकार करत आहे, अशी घणाघाती टीका पटोलेंनी केली.

ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन समाजाची फसवणूक करत आहेत, तर दुसरीकडे सदावर्ते नावाचा वकील मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार अशी दर्पोक्ती करत आहेत. या सदावर्तेंचा बोलविता धनी कोण आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. सदावर्तेंनी यापूर्वीही विविध मुद्द्यांवर भाजपधार्जिणी भूमिका घेतली आहे. सदावर्ते हा फडणवीस यांनी दिलेली भूमिका मांडत असतो. यावरून मराठा आरक्षणाला कोणाचा विरोध आहे आणि मराठा विरुध्द ओबीसी वाद कोण उभा करत आहे, हे स्पष्ट होतं.

ओबीसी जनजागरण यात्रा
केंद्रातील मोदी सरकार आरक्षणविरोधी आहे. मोदी सरकारही जातनिहाय जनगणनेच्या विरोधात आहे. हे सरकार जातनिहाय जनगणनाही करत नाही आणि डॉ. मनमोहन सिंग सरकारने केलेली जनगणनाही जाहीर करत नाही. मागास समाजांना आणखी कमजोर करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. राहुल गांधी यांनी राज्यातील जनतेसमोर मांडलेल्या जातनिहाय जनगणनेची भूमिका अधोरेखित करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग ३ जानेवारीपासून राज्यात ओबीसी जन जागरण यात्रा काढणार आहे.

सुतळी खरेदीत भ्रष्टाचार

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता या सरकारने सुतळी खरेदीतही भ्रष्टाचार केला आहे. बाजारात 72 रुपये किलो दराने उपलब्ध असलेली सुतळी 410 रुपये किलो या दराने खरेदी करून सरकारने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. जनतेचा कष्टाचा पैसा दिवसाढवळ्या लुटला जात आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही, ड्रग माफिया, दरोडेखोर, महिला अत्याचारात वाढ झाली, पण सरकार मात्र, कुंभकर्णी झोपेत आहे, असं पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज