Shivsena-VBA : शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीवर जयंत पाटील म्हणाले…

Shivsena-VBA : शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीवर जयंत पाटील म्हणाले…

मुंबई : ‘राजकीय पक्षांबाबत बोलायचं झालं तर राजकीय पक्षांबाबत विचारधारेचा देखील विचार केला जातो. त्यांच्याकडे किती आमदार आहेत आणि किती नाही याचा विचार केला जात नाही. निवडणुकीत आमदार निवडून येऊ शकतात. वेगवेगळ्या विचारधारा, दोन पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडे किती आमदार आहेत. यापेक्षा ते किती आमदार निवडून आणू शकतात यावर युती किंवा आघाडी ठरत असते.’ शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीवर अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीच्या संदर्भात झालेली त्यांच्या पत्रकार परिषदेत काय झालं ? हे आम्हाला माहित नाही. ती माहिती मिळाली की त्यावर बोलू. असं देखील जयंत पाटील म्हणाले.

राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) तसेच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चना आखेर पूर्ण विराम मिळाला आहे. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, की मी शरद पवारांकडे बघत बसलो आणि मला माझ्याच लोकांनी दगा दिला. आता आम्ही वंचित बरोबर जागा वाटप निश्चित करून एकत्र आलो आहोत. या युतीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला आहे. प्रत्येक पक्ष आपला मित्र पक्ष सांभाळेल. त्यामुळे महाविकास आघाडीचा वंचितला अजिबात विरोध नाही.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उपेक्षितांच्या राजकारणाची सुरुवात व्हावी. यासाठी हा प्रयत्न आहे. जिंकणे राजकीय पक्षांच्या हातात नाही, पण उमेदवारी देणे हातात आहे. शरद पवार आमच्या आघाडीसोबत येतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शरद पवार यांच्यासोबत शेतातलं भांडण नाही. तर मुद्द्यांचं भांडण आहे. ईडीच्या माध्यमातून देशातील राजकीय नेतृत्व संपविण्याचा घाट घातला जात आहे.

शिवसेना प्रमुखांचा आज जन्मदिवस आहे. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहात होता. तो क्षण आता आला आहे. प्रथम देशहित लक्षात ठेवून तसेच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तर उपेक्षितांच्या राजकारणाची सुरुवात व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube