पवारांचं राजकारण फडणवीसांनी मोडलं; सदाभाऊ खोतांनी सांगितला ‘तो’ किस्सा!

पवारांचं राजकारण फडणवीसांनी मोडलं; सदाभाऊ खोतांनी सांगितला ‘तो’ किस्सा!

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडानंतर या पक्षाला मोठी गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. सभा घेत पक्षातील बंडखोरांवर तुटून पडले आहेत. मात्र, राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीवर रयत क्रांती संघटेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

शरद पवारांचा मोठा दरारा होता. एवढा दरारा की अनेक मोठ्या संस्थांवर तेच प्रमुख असायचे. त्यांचा दरारा इतका होता की किती माणसं गायब झाली असतील याचा पत्ता नाही.

शिंदे सरकारसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! 12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा; SC ने स्थगिती उठवली

फडणवीसांना मी कालही म्हटलं, भारा विस्कटलेला आहे. पेंड्या वेगळ्या केलेल्या आहेत. जे कुणालाही जमलं नाही ते ऐतिहासिक काम तुम्ही केलं. म्हणजेच, पवारांनाही मोडू शकतो. मोडणारा या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. हे महाराष्ट्रानं पाहिलं. आम्हाला वाटायचं ते अशक्य आहे पण, फडणवीसांनी ते करून दाखवलं. आमच्यासारख्या चळवळीतील लोकांना ज्यांनी मार खाल्ला त्यांनी हे याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य मिळाले, अशा शब्दांत खोत यांनी फडणवीसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

फडणवीस-महाजनांना जेलमध्ये टाकण्यासाठी कारस्थानं

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात रोजच मोर्चे निघत होते. मग काँग्रेसचे सरकार असताना इतके प्रश्न का प्रलंबित ठेवले. त्या काळात फडणवीस यांची जात काढली. का तर आमच्या सुभेदाऱ्या नष्ट होऊ नयेत यासाठी. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना आत टाकण्यासाठी किती कारस्थानं केली हे दिसत नाही.

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’, फडणवीसांचं नाव घेण्याची लायकी नाही; तुषार भोसलेंचा निशाणा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube