निवडणूक आयोग काम नीट करत नाही, एका ठिकाणी 140 लोकांचं मतदान; पवारांचा हल्लाबोल
निवडणूक आयोग (Election Commission) त्यांचं काम योग्य पद्धतीने करत नाही, एक व्यक्ती राहते अशा ठिकाणी 140 लोकांनी मतदान केलं

Sharad Pawar : निवडणूक आयोग (Election Commission) त्यांचं काम योग्य पद्धतीने करत नाही, एका घरात 140 सदस्य कसे असतील ? अन् त्यांनी मतदान केलं. राहुल गांधींनी निवडणूक आयोग कसं काम करतं, हे सगळं समोर आणलं. त्यामुळं आम्हाला निवडणूक आयोगाकडून फार अपेक्षा नाहीत, अशी टीका शऱदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली.
राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत
शरद पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, काल मुख्यमंत्री फडणीसांनी मला फोन केला. सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांनी विनंती केली. मी त्यांना सांगितलं ते शक्य नाही, ते आमच्या विचारांचे नाहीत. इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या अन् आम्ही काल बी. सुदर्शन यांचा फॉर्मही भरला. राधाकृष्णन यांना झारखंडचे सीएम सोरेन भेटायला गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. राधाकृष्णन यांच्या राज्यभवनात सत्तेचा दुरुपयोग झाला होता, अशी टीकाही पवारांनी केली.
चलती का नाम गाडी, रूक गये तो खटारा! मोदी सरकारच्या कारभारावर अण्णा हजारे काय बोलून गेले? पाहा VIDEO
पुढं ते म्हणाले, एनडीएकडे मतांची संख्या जास्त आहे, पण आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी आमची मत कमी असली तरी आम्हाला चिंता नाही. खरंतर आम्ही सरकारचा विचार करत नाही तर निवडणूक आयोगाचा विचार करतो. निवडणूक आयोग त्यांचं काम योग्य पद्धतीने करत नाही, निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. मात्र, त्यांनी त्यांची जी भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नाही, असे म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही पवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
निवडणूक आयोगाकडून आमची फार काही अपेक्षा नाही, राहुल गांधींनी हे सर्व सत्य समोर आणलं, मात्र याची सुरूवात बिहारमधून झाली. राहुल गांधींना सांगितलं एका झोपडपट्टीत एका घरात 140 लोकं राहतात, एक घरात 140 सदस्य कसे असतील, निवडणूक आयोग त्यांचं काम नीट करत नाही, त्यामुळं आम्हाला निवडणूक आयोगाकडून फार अपेक्षा नाहीत, असं पवार म्हणाले.
बिहार राजकीयदृष्ट्या जागृत राज्य आहे. राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला, असंही पवार म्हणाले.