Eknath Shinde : …म्हणून उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

Eknath Shinde : …म्हणून उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

औरंगाबाद : ‘निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूने आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आहे आणि बिथरलेले आहे त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे. पण आम्ही कामाने उत्तर देऊ.’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते औरंगाबाद येथे आले असता बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझं चुकलं…, व्हायरल व्हिडीओनंतर स्पष्टीकरण

औरंगाबाद शहरातील औरंगाबाद मुंबई हायवे जवळ साजापूर परिसरामध्ये आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद येथे आले असता त्यांचे औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री संदिपान भुमरे व आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यार्थी व नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

त्याचबरोबर यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण बाळासाहेबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिफ्ट दिलेला होता. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही’ पण निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे. असंही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube