महाविकास आघाडीला तोडण्याचं काम सुरु, आशिष देशमुखांचा नानांवर गंभीर आरोप

  • Written By: Published:
महाविकास आघाडीला तोडण्याचं काम सुरु, आशिष देशमुखांचा नानांवर गंभीर आरोप

नागपूर : माझ्या माहितीनुसार 16 तारखेला राहुल गांधी उपलब्ध होते. परंतु मुदामून त्यांची वेगळी वेळ घेतली महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची वज्रमूठ होत आहे. तिला सैल आणि महाविकास आघाडीला तोडण्याचं काम नाना पटोले करत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. ते आज नागपुरात ABP माझाशी बोलत होते.

मागच्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरला जी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली ती होऊ न देण्याचा प्रयत्न दिल्ली दरबारी या खोक्याच्या राजकारण्यांनी केला. म्हणून हे तेथे हजरराहू शकले नाही. असा आरोप देशमुखांनी नाना पाटोळेंवर केला.

तुमचे आधार कार्ड जुने झाले आहे? ही बातमी तुम्ही मग अवश्य वाचा… 

शिस्तपालन समितीची बैठक झाली आहे परंतु माझ्यापर्यंत अजून पर्यंत शिस्तभंगाची नोटीस आलेली नाही साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत माझ्या विरोधात पक्षश्रेष्टींकडे कोणतेही पुरावे नसावेत म्हणून मला नोटीस पाठवली नसावे. आजपर्यंत जीजी भूमिका मी घेतली तसेच आज पर्यंत मी जे वक्तव्य केलं ते पक्ष हिताचं आहे हे मी नक्की सांगेल. असं देखील यावेळी देशमुख म्हणाले

खोक्याच्या संबंधात आता एक नवीन अध्याय पाहिला तर दिल्ली वरून आलेले प्रदेश अध्यक्ष म्हणतात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची सभा तिसऱ्या आठवड्यात नागपूरला होत आहे. जेव्हा 16 तारखेला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपुरात होत आहे तेव्हा नाना पटोले यामध्ये खोडा घालण्याचं काम करत आहेत ते हि सभा कॅन्सल करून काँगेसचे वेगळी सभा घेण्याचा विचार करत आहेत. आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube