निवडणुका घेऊन एकदाचा सोक्ष-मोक्ष लावा, जयंत पाटलांचं खुलं आव्हान

निवडणुका घेऊन एकदाचा सोक्ष-मोक्ष लावा, जयंत पाटलांचं खुलं आव्हान

Jayant Patil News : भाजपने निवडणुका घेऊन एकदाचा सोक्ष-मोक्ष लावावा, असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलं आहे. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

बाळासाहेब म्हणाले होते…काँग्रेससोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल

ते म्हणाले, सत्ताधारी भाजपने आपल्या मनासारखंच वार्ड तयार करण्याचा प्रयत्न केल्यानेच निवडणुका लांबणीर पडल्या आहेत.
राष्ट्रवादी तर म्हणतेय लवकरात लवकर निवडणुका घ्या अन् काय असेल तो एकदाच सोक्ष-मोक्ष लावा, पण भाजपचं पाप जनता त्यांच्या पारड्यात टाकणार असल्याचं निवडणुका घेत नाहीत, या शब्दांत त्यांनी सत्ताधारी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच कसेही वार्ड तयार झाले तरीही आम्ही घाबरत नसल्याचाही इशार त्यांनी दिला आहे.

9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा

तसेच भाजपचं पाप अजून लोकं विसरलेले नाहीत, निवडणुकीत आपलं पाप जनता आपल्या पारड्यात टाकण्याचं काम करेल, याची भाजपला भीती आहे म्हणूनच भाजप निवडणुका घेत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय की, न्यायालयात केस चालू आहे.

पण एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांनीच आज जे वार्ड आहेत ते तयार केले आहेत. त्यामुळे आज तेच विरोध करत असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे. आपल्या मनासारखंच वार्ड तयार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत, पण वार्ड कसेही झाले तरी आम्ही घाबरत नसून एकदाच निवडणुका घेऊन काय असेल तो सोक्ष-मोक्ष लावा, असं आव्हानच त्यांनी शिंदे-फडणवीसांनी दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube