…तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, अजित पवार अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे आदेश

अहवाल आल्यानंतर पुढं जे काही येईल, त्यानंतर आम्ही तुमच्या केसचा विचार करु असं माननीय न्यायालय म्हटलं आहे.

Mumbai High Court

अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान (Accident) अपघातात निधन झाले. या प्रकरणात हायकोर्टाने आज महत्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात AAIB चा अंतिम अहवाल येत नाही तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाही असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

या प्रकरणाचा पाठपुरावा अजितदादा यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी लावून धरला आहे. आता हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांची काय प्रतिक्रीया येते याकडे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या दोन याचिका मागे घेण्यात आल्या आहेत. कारण, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात AAIB चा अंतिम अहवाल नाही, तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असं म्हटलं आहे. त्यामुळं या दोन याचिका मागं घेण्यात आल्या आहेत.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात होणार मोठा खुलासा, VSR कंपनी मालक रोहित सिंह CID कार्यलयात

या याचिकाकर्त्यांना पुन्हा दाद मागण्याची मुभा देण्यात आली असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा जोपर्यंत AAIB दिल्ली यांचा अंतिम अहवाल येत नाही, जोपर्यंत तपास चालू आहे. त्यांच्याकडून तपासातून काही निष्कर्ष पुढं येत नाही आणि अहवाल पुढं येत नाही, तोपर्यंत आम्ही काय करु शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढं जे काही येईल, त्यानंतर आम्ही तुमच्या केसचा विचार करु असं माननीय न्यायालय म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही आता AAIB दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा करु आणि AAIB दिल्ली यांनी जर दोन महिन्यात अहवाल पाठविला नाही तर आम्ही पुन्हा न्यायालयात येणार आहोत असे यावेळी याचिकादाराच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.

follow us