live now
PM Modi In Pune Live : पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे शहर : मोदी
PM Modi In Pune Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून, काहीवेळापूर्वी मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर आता मोदींच्या हस्ते दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण होणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्याआधी पुण्यात दाखल झाल्यानंतर मोदींच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा आणि अभिषेक करण्यात आला. एस. पी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ होती. मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्याचा मिनिट टू मिनिट अपडेट देणारा लाईव्ह ब्लॉग.
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यातून बंगळुरूच्या कोंडीवरून हल्लाबोल
मोदी म्हणाले की, एका बाजूला आपण पुण्यात होत असलेला विकास पाहू शकतो आणि दुसऱ्या बाजूला आपण बंगळुरूमध्ये काय घडत आहे तेही पाहू शकतो. बंगळुरू हे एक प्रमुख आयटी हब आहे, तिथे वेगाने विकास व्हायला हवा होता, पण कर्नाटक सरकार स्वतः मान्य करते की त्यांच्याकडे बंगळुरू किंवा कर्नाटकच्या विकासासाठी पैसा नाही. राजस्थानचीही तीच परिस्थिती आहे, तिथे कर्जे वाढत असून विकास कामे होत नसल्याचे सांगत मोदींनी विरोधकांचे कान टोचत हल्लाबोल केला.
#WATCH | On one side we can see development happening in Pune and on the other side we can see what is happening in Bengaluru...Bengaluru is a prominent IT hub, there should have been fast-paced development but a govt was formed there, by giving big announcements and now, within… pic.twitter.com/bhBJX7yLBg
— ANI (@ANI) August 1, 2023
-
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे देशाला चालना
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे भारताच्या औद्योगिक विकासाला सातत्याने चालना मिळाली आहे. भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधरायचे असेल, तर सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. 2014 पर्यंत 250 किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं. पण आता देशात हे नेटवर्क 800 किमीहूनही जास्त झालं आहे.
2014 मध्ये फक्त 5 शहरात मेट्रोची सेवा होती. पण आज देशात 20 शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरले असून, महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्येदेखील मेट्रोचा विस्तार होत आहे. पुण्यात प्रदुषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार गरजेचा असल्याचेही यावेळी मोदींनी अधोरेखित केले. पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा दर्जा अधिक चांगला व्हावा यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचा विकास होईल. भारताचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होईल
-
भारताच्या विकासाचा फायदा पुण्यालाही - मोदी
आज जग भारताच्या विकासाची चर्चा करत आहेत याचा फायदा पुण्यालादेखील होत आहे. पुण्यासारख्या शहरात क्वालिटी ऑफ लाइफ सुधारण्यासाठी भाजप सरकार सातत्याने काम करत आहे. पुणे मेट्रोचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा मला त्याचं भूमिपूजन करण्याची संधी मिळाली होती. या पाच वर्षात येथे तब्बल 24 किलोमीटर मेट्रो नेटवर्क सुरू झाल्याते यावेळी मोदींनी सांगितले. कोथरूड डेपोला याआधी कचरा डेपो होता आज तिथे मेट्रोचा डेपो उभरला आहे.
-
ऑगस्ट महिना क्रांतिचा - मोदी
ऑगस्ट महिना हा उत्सव आणि क्रांतिचा महिना आहे. क्रांतिच्या या महिन्यात सुरुवातीलाच पुणे येथे येण्याचे सौभाग्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्यात पुण्याचा मोठे योगदान राहिले आहे. एवढेच नव्हे तर पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे शहर असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.
-
मागच्यावेळी शिंदे, पवार अन् माझा रोल वेगळा होता पण...
मागच्यावेळी अजितदादा, एकनाश शिंदे आणि मी इथे होतो. त्यावेळी तिघांचे रोल वेगळे होते. मी विरोधीपक्षनेता होतो, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. पण आज पुण्याच्या स्वप्नांना गती देण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आल्याचे फडणवीस म्हणाले. पुणे मेट्रोचा आणखी एक टप्पा सुरु होतोय. याआधी मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यानंतर पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि आज दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, उद्घाटन मोदीच करत आहेत.
-
मोदींच्या हस्ते विकासकामांचं लोकार्पण
लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विविध विकासकामाचं लोकार्पण केले जाणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. ते म्हणाले की, मोदींच्या विकासाला गती देण्याचे काम मोदींनी केले आहे. आज अनेकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे दिली जाणार आहे. ती कृपाकरून विकण्याचा विचार करू नये असे म्हणत आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, त्यांना चांगले नागरिक बनवा असे सांगितले.
-
40 हजार लोकांनी टिळकांच गुजरातमध्ये स्वागत केलं होतं - मोदी
मोदींनी यावेळी सांगितले की, स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. सरदार पटेलही टिळकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यावेळी 40 हजार लोकांनी टिळकांच गुजरातमध्ये स्वागत केल्याचे सांगत महाराष्ट्राप्रमाणे गुजरातच्या जनतेच टिळकांशी विशेष नात असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.
-
लोकमान्य गंगाधर टिळकांकडे तरुणांना ओळखण्याची कला होती
मोदी म्हणाले की, लोकमान्य गंगाधर टिळकांकडे तरुणांना ओळखण्याची कला होती, त्यांनी फक्त वीर सावरकरांना ओळखले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. वीर सावरकरांनी परदेशात शिक्षण घेऊन परत आल्यानंतर देशसेवा करावी, अशी टिळकांची इच्छा होती. टिळकांनी वीर सावरकरांची शिफारस केली होती, तसेच त्यांनी राष्ट्र उभारणीला चालनादेखील दिली होती. लोकमान्य टिळकांना हेही ठाऊक होते की, स्वातंत्र्य चळवळ असो किंवा राष्ट्र उभारणीचे ध्येय असो, भविष्याची जबाबदारी नेहमीच तरुणांच्या खांद्यावर असते.
#WATCH मैंने पुरस्कार राशि नमामि गंगे परियोजना को दान करने का फैसला किया है। मैं यह पुरस्कार देश के 140 करोड़ लोगों को समर्पित करता हूं: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/pZQZU4Qwqd
— ANI_HindiNews (@AHindinews) August 1, 2023
-
काशी आणि पुणे या दोघांची विशेष ओळख - मोदी
काशी आणि पुणे या दोघांची विशेष ओळख आहे. विद्धवता इथे अमर आहे. पुणे विद्धवतेची ओळख. इथे हा सन्मान होणं हा आयुष्यातील समाधानाच क्षण. पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकमान्य टिळकांची छाप प्रत्येक ठिकाणी होती. टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली. भारतीय देश चालवू शकत नाही असं इंग्रज म्हणायचे. त्यावेळी टिळक म्हणाले होते की, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
-
मी पुरस्कार राशि नमामि गंगे योजनेसाठी दान करणार - मोदी
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, मी पुरस्कार राशि नमामि गंगे योजनेसाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी येथे येऊन जितका उत्साहित आहे, तितकाच भावूक असून, हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांसाठी समर्पित करतो असे मोदींनी यावेळी सांगितले. पुण्याच्या पावन भूमीवर आणि महाराष्ट्र धर्तीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे ते म्हणाले. ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू , सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची भूमी आहे. या सर्वांना मी नमन करतो.
-
मोदींनी पुणेकरांची मनं जिंकली; मराठीतून केली भाषणाला सुरूवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत सुखद असून, हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केल्याने एकप्रकारे त्यांनी पुणेकर आणि उपस्थितांची मने जिंकली आहेत.
-
पत्रकारितेवर दबाव असता काम नये, ती मुक्त असली पाहिजे - पवार
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचे असेल तर सामाजिक जागृती करावी लागेल. त्यासाठी पत्रकारिता हे शस्त्र टिळकांनी वापरले. एवढेच नव्हे तर, केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून इंग्रजावर प्रहार केला, त्यातून लोकजागृती केल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पत्रकारितेवर दबाव असता काम नये, ती मुक्त असली पाहिजे असे टिळक नेहमी म्हणायचे असेही पवारांन यावेळी स्पष्ट केले.
-
लाल महालात पहिला सर्जिकल स्ट्राईक - पवार
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सगळ्या जगाला माहित आहे. या देशात अनेक राजे संस्थान होऊन गेले. पण छत्रपती यांनी राज्य उभे केले ते हिंदवी स्वराज्य होते, रयतेचे राज्य होते. अलीकडच्या काळात या देशाच्या जवानाने सर्जिकल स्ट्राईक केला होता, लाल महालात शाहिस्ते खानवर पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता असे शरद पवार म्हणाले.
-
मोदींनी ठरवलं की ते करतातचं; CM शिंदेंकडून स्तुतिसुमनं
पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अक्षरक्षः कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, मोदींनी एकदा ठरवले की ते काम ते पुर्णत्वास नेतात. देशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थिकदृष्ट्या दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आणले आहे. "लोकमान्य टिळक हे प्रखर देशभक्त होते, ब्रिटीशांविरोधात लढताना त्यांच्या शब्दांना कमालीची धार येत असे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मोदींनी मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या वतीन मी त्यांचं अभिनंदन करतो" असे एकनाथ शिंदे म्हणाले.
#WATCH | Pune: Maharashtra CM Eknath Shinde says, "It is a matter of pride for us when leaders of other countries take his (PM Modi's) autography and respect him. Some call him boss and some touch his feet." pic.twitter.com/ioOiM48Qbq
— ANI (@ANI) August 1, 2023
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जगातील अनेक नेत्यांना मोदींची भूरळ पडली आहे, मोदींनी आत्मनिर्भर भारत, असा मंत्र आपल्याला दिला असून, आजचा पुरस्कार सोहळा ऐतिहासिक क्षण आहे. टिळक पुरस्कार मिळणं हे मोदींच्या कार्याची पावती असल्याचेही शिंदेंनी यावेळी सांगितले.
-
म्हणून नरेंद्र मोदींना पुरस्कार देण्याचे निश्चित झाले
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजपर्यंत या पुरस्काराने 40 जणांना गौरवण्यात आले आहे. यावेळी हा पुरस्कार देण्यासाठी सर्व विश्वस्थ जमले तेव्हा आमच्यापुढे एकच नाव आलं ते म्हणजे नरेंद्र मोदींचे असे लोकमान्य टिळक पुरस्कार ट्रस्टचे दीपक टिळक यांनी सांगितले. लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र्य, अधुनिक आणि बलाढ्य हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले होते, राष्ट्रीयत्व, हिंदुस्थानच्या पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, अधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी तंत्रज्ञान लोकमान्यांनी सांगितले होते आणि हे सूत्र नरेंद्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्या राष्ट्रात आम्हाला दिसत असल्याने या पुरस्कारासाठी मोदींची निवड केल्याचे दीपक टिळक यांनी स्पष्ट केले.
-
शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर उपस्थित
लोकमान्या टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एस.पी. महाविद्यालयात दाखल झाले असून, मोदींसोबत स्टेजवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यपाल बैस उपस्थित आहेत. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एका व्यासपीठावर उपस्थित आहेत.
Maharashtra: Prime Minister Narendra Modi to be conferred with Lokmanya Tilak National Award in Pune today. pic.twitter.com/evpO7MxcPC
— ANI (@ANI) August 1, 2023
-
मोदींआधीच शरद पवार स्टेजवर दाखल
दगडूशेठ मंदिरात पुजा-अर्चा केल्यानंतर पंतप्रधान नेरेंद्र मोदी पुरस्कार सोहळ्यासाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पोहोचले आहेत. या सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार की नाही याबाबत अनेक उलट सुलट चर्चा झाल्या मात्र शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती त्यामुळे आज शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित असणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र शरद पवार हे सर्वात आधी व्यासपीठावर येऊन बसले होते.
Letsupp Image (47)
-
दगडूशेठ मंदिरात पूजा संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले असून, नियोजित दौऱ्याप्रमाणे सध्या मोदी पुण्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर दगडूशेठ मंदिरात पूजा-अर्चा संपन्न झाली असून, मोदींचा ताफा स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=VFjo82pQtmE
-
PM मोदींसाठी 'खास' ढोल ताशा पथक; दगडूशेठ हलवाई मंदिरात करणार पूजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात खास ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर त्यांचं पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता मंदिरात त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची पुजा करण्यात येणार आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले असून ते हेलिकॉप्टरने अॅग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर दाखल झाले आहेत. तिथून ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाणार आहेत.
-
दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन घेणार दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.1) पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
-
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुूरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज पुण्यात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापल आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करत जोरदार आंदोलन केले. मंडई परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेस नेते मोहन जोशी यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
-
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यास विरोधकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत असताना मणिपूर नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभागी होत मणिपूर राज्यातील विदारक घटनेचा निषेध करीत नरेंद्र मोदी चले जाव च्या घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.