IND vs AUS 4th T20I : चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरचं कमबॅक; कुणाचा पत्ता होणार कट ?

IND vs AUS 4th T20I : चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरचं कमबॅक; कुणाचा पत्ता होणार कट ?

IND vs AUS 4th T20I : पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे दोन सामने जिंकत टीम इंडियाने (IND vs AUS) आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयापासून (India vs Australia) भारताला रोखले आहे. आता या मालिकेतील चौथा टी 20 सामना उद्या (1 डिसेंबर) जयपूर येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर कमबॅक करील अशी शक्यता आहे. अय्यर जर परतला तर कुणाला डच्चू मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. तो जर संघात आला तर तिलक वर्माला (Tilak Verma) खाली बसावे लागेल. कारण, तिलक वर्मा अजूनही चांगली कामगिरी करू शकलेला नाही. संघात यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), इशान किशन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे पहिल्या फळीतील फलंदाज असतील. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग फलंदाजीसाठी येऊ शकतात.

Ind vs Aus: गुवाहाटीत ऋतुराजचे वादळ ! ऑस्ट्रेलियाची धुलाई करत टी-20 त झळकविले पहिले शतक

दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad ) विश्वविजेता ऑस्ट्रेलियाची (Australia) गोलंदाजी फोडून काढली. ऋतुराजने स्फोटक खेळत टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने 52 चेंडूत शतक ठोकले. तो 123 धावांवर नाबाद राहिला. ऋतुराजने आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. मात्र यानंतरही ऑस्ट्रेलियाने भारताच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला त्यामुळे ऋतुराजचे शतकही भारताल विजयी करू शकले नाही. आता पुढील सामन्यात सामना जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना उद्या होणार आहे. उद्याचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा राहणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य राहणार आहे. तर दुसरीकडे सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी करण्याची संधी सोडणार नाही. आता संघात ग्लेन मॅक्सवेल परतला आहे. त्यामुळे भारतासाठी पुढील सामने जास्त आव्हानात्मक राहणार आहेत. कारण तिसरा टी 20 सामना मॅक्सवेलनेच हिसकावून नेला होता.

Glenn Maxwell : ‘मॅक्सवेल’च्या तुफानी खेळीचा ‘हिटमॅन’ला फटका; मोठं रेकॉर्ड संकटात

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. त्याने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत. कालच्या सामन्यात त्याच्या याच विक्रमाची बरोबरी मॅक्सवेलने केली. आता आणखी एक शतक केले की तो रोहितच्या पुढे निघून जाईल. मॅक्सवेलचे हे भारताविरुद्ध टी 20 मधील दुसरे शतक आहे. याआधी 2019 मध्ये बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने शतक केले होते. या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube