IPL 2023, GT vs MI : गुजरात टायटन्सने केला मुंबईचा खेळ खल्लास, मारली अंतिम फेरीत धडक

  • Written By: Published:
IPL 2023, GT vs MI : गुजरात टायटन्सने केला मुंबईचा खेळ खल्लास, मारली अंतिम फेरीत धडक

IPL 2023, GT vs MI : मुंबईचा पराभव करत गुजरातने अंतिम फेरीत धडक मारली आहे. संघाने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईचा 62 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 233 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना मुंबईचे खेळाडू केवळ 171 धावाच करू शकले. गुजरातकडून शुभमन गिलने शतक झळकावले. तर मोहित शर्माने 5 बळी घेतले. आता अंतिम फेरीत गुजरातचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 16 वा मोसमात . आज क्वालिफायर-2 सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने आहेत. अहमदाबादमध्ये हा सामना खेळला गेला . अहमदाबादमध्ये सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला, जो आता थांबला आहे. पावसामुळे सामना अर्धा तास उशिरा सुरू झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली होती. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी मिळून 6.2 षटकात 54 धावांची तुफानी भागीदारी केली. फिरकीपटू पियुष चावलाने साहाला यष्टीचीत करून ही भागीदारी तोडली. साहाने तीन चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. पहिली विकेट पडल्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यादरम्यान गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत अवघ्या 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 234 धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. त्याने 129 धावा केल्या. शुभमनच्या खेळीत 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. हार्दिक पांड्याने नाबाद 28 धावा केल्या. साई सुदर्शनने 43 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून पियुष चावला आणि आकाश मधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद

मुबईची सुरुवात चांगली झाली मुंबईने 6 षटकात 2 बाद 70 धावा केल्या. आज पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माने नाराज केले तो केवळ 8 धावा करून शमीचा शिकार झाला. जखमी ईशान किशनच्या जागी सलामीला आलेला नेहाल काही खास करू शकला तो केवळ 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक शर्मा आणि सूर्याने मुंबईचा डाव सावरला तिलकने चांगले फटके मारून केवळ 14 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. सूर्या चांगला फोममध्ये दिसत होता परंतु तो देखील 61 धावा करून मोहित शर्माचा शिकार झाला. मुंबईने 18 .2 षटकात सर्वबाद 171 धावा केल्या.

गुजरातकडून मोहित शर्मनाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर शमी, राशीदने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर लिट्टेने 1 विकेट घेतली आता गुजरातचा अंतिम सामना रविवार 28 मे ला चेन्नई सोबत अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. जाईल. यंदा IPL कोण जिंकते याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube