U-19 T20 WC: विश्वविजेता होण्यासाठी भारतासमोर 69 धावांचे आव्हान, गोलंदाजांच उत्कृष्ट प्रदर्शन

U-19 T20 WC: विश्वविजेता होण्यासाठी भारतासमोर 69 धावांचे आव्हान, गोलंदाजांच उत्कृष्ट प्रदर्शन

पॉचेफस्ट्रूम : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 19 वर्षाखालील महिला विश्वचषकाचा (U19 Women’s T20 World Cup Final) अंतिम सामना खेळला जात आहे. अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं आहे.

त्यामुळे आता विश्वचषक विजयासाठी भारतासमोर 69 धावांचे माफक आव्हान आहे. भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली. यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन विकेट्सही घेतल्या.

अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन मन्नत कश्यप, शेपाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक 19 धावा केल्या.

तर भारत आणि इंग्लंड हा अंडर 19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता ही फायनल अगदी चुरशीची आणि रंगतदार होईल असं वाटत होतं.

पण भारतानं पहिल्या हाल्फमध्ये एकतर्फी खेळ दाखवला आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी निवडली. कर्णधाराच्या निर्णयाला साजेशी खेळी करत भारतीय महिलांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या खेळाडूंना तंबूत धाडणं सुरु ठेवलं.

17.1 षटकांत संपूर्ण इंग्लंडचा संघ 68 धावांवर सर्वबाद झाला असून आता 69 धावांचं माफक लक्ष्य पार करण्यासाठी भारत मैदानात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube