पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत केले. गायकवाड याने लढतीतून माघार घेतल्यानंतर मोहोळ याला पंचांनी विजयी घोषित केले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याच्याकडून गोंधळ घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पंचाच निर्णय मान्य नसल्याचं म्हणत शिवराजने पंचाला लाथ मारल्याचं दिसून आलं.