- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर : नाना पटोले
नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस […]
-
अवतार: द वे ऑफ वॉटर, फिल्म रिव्ह्यू
२००९ मध्ये ‘अवतार’ पहिल्यांदा आला तेव्हा या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’चा सिक्वेल सिनेमागृहात अवतरलाय. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटात पाणी आणि पाण्याखालील अनोखं विश्व आपल्यासमोर मांडलंय. अद्भूत व्हिएफएक्स, रिअल साऊंड इफेक्टस आणि नेत्रदीपक दृश्ये पाहण्याचा हा एक विलक्षण अनुभव आहे. ‘अवतार: द वे […]
-
‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ फिल्म रिव्ह्यू
एखाद्या फिल्ममेकरसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय असू शकतं? तर पूर्ण चित्रपट एखाद्या कलाकाराला डोळ्यासमोर ठेऊन विचार केलेला असतो आणि अचानक त्या कलाकाराचे निधन होते. हेच घडलं मार्वलच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ ह्या चित्रपटाच्या वेळी. ब्लॅक पँथरला खरी ओळख मिळाली ती चॅडविक बोसमनच्या भूमिकेने. पण 2020 मध्येच सुपरहिरो ब्लॅक पँथर उर्फ सम्राट टीचालाची भूमिका करणारा चॅडविक […]
-
श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी करणार- देवेंद्र फडणवीसांची घोषणा
नागपूर : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारी लक्षवेधी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशिष शेलार यांची मागणी मान्य करीत विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्याची घोषणा केली. ‘कोणत्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी सरकारने काळजी केली पाहिजे. श्रध्दा वालकर प्रकरणात […]
-
राष्ट्रवादीला धक्का, आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री सरपंचपदी विजयी
सांगली : आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री विजय झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्य विजयी झाले आहेत. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत […]
-
ग्रामपंचायत निवडणूक: शिंदे गटाला औरंगाबादमध्ये दुसरा मोठा धक्का
औरंगाबाद : जिल्ह्यात 208 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. आज सकाळी आकरा वाजता ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरवात झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. पैठण तालुक्यातील शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची बनलेली बिडकीन ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. आता वैजापूर तालुक्यातील महालगावची ग्रामपंचायत देखील ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश […]
-
शाई फेकीचा राज्य सरकारला धसका, शाई पेनावर प्रतिबंध
नागपूर : शाई फेकीचा सरकार आणि भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. शाई फेकीपासून वाचण्यासाठी आता विधानभवन परिसरात तसेच भाजपच्या कार्यक्रमांत शाई पेन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिल्ड वापरण्यास सुरुवात केली आहे. आता त्यापुढे आता शाई पेनवर देखील बंधन आणली जात आहे. विधान भवन परिसरात पहिल्या दिवशी प्रवेश […]
-
विरोधकात दमच नाही, खरी लढाई नरेटिव्हशी – देवेंद्र फडणवीस
नागपूर : आपलं सरकार सत्तेत येऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्रातील निर्णय-लकवा आपण संपविला. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीत महाविकास आघाडीवर केली. गेल्या अडीच वर्षात कोणत्याही घटकाला मदत त्यांनी केली नाही. विकास कामांना स्थगिती […]
-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत नवीन खर्चिक आजारांचा समावेश
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत नवीन आजारांचा समावेश केला आहे. विशेष बाब म्हणजे याआधी या योजनेत मोजक्याच आजारांचा समावेश होता. मात्र आता खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. […]
-
चंद्रकांत पाटलांवर गुन्हा का दाखल करत नाही? : नाना पटोले
नागपूर : भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? […]










