- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळंच उमेश कोल्हेंची हत्या, एनआयएचा खुलासा
अमरावती : येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे प्रकरणात नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात एनआयएकडून 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळंच उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती, असा मोठा खुलासा एनआयएकडून करण्यात आलाय. एनआयएकडून सांगण्यात आले की, ज्या व्यक्तीने उमेश कोल्हेंची हत्या केली, तो तबलिगी जमातचा होता आणि पूर्णपणे […]
-
शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा, कॅफेटेरिया परिसरात निर्बंध लावा; अंबादास दानवेंची मागणी
नागपूर : शाळेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शाळेत टप्प्याटप्प्यानं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियांवर निर्बंध लावावेत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अल्पवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे व शाळेत सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहेत, त्याबाबत सरकारनं काही उपाययोजना केल्यात का? त्याचबरोबर अल्पवयीन मुलांच्या हातून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर […]
-
अखेर ठरलं! ‘या’ दिवशी एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा देणार
नवी दिल्ली : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलेय. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होती. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत नेटकऱ्यांना विचारलं होतं की, ‘मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी […]
-
राज्यात थंडीचा कडाका वाढला, काही दिवस पारा आणखी घसरणार
मुंबई : काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. याच शेती पिकांवर परिणाम होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा आणखीच घसरलाय. त्यामुळं थंडीचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळतंय. गारठा वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. आजपासून (दि. 21) संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात घट होवून ते […]
-
पुतण्याचा काकाला धोबीपछाड! नवगण राजुरीत संदीप क्षीरसागर यांच्या गटाचा दणदणीत विजय
बीड : जिल्ह्यातील काका पुतण्याच्या लढतीत पुन्हा पुतण्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वादानंतर बीड तालुक्यातील नवगण राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच गटाला झुकतं माप दिलंय. ग्रामपंचायत निवडणूक निकालात आज संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविलाय. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या […]
-
गुलाल आपलाच! धनंजय मुंडे यांच्याकडून विजयी सरपंचांसह उमेदवारांचं अभिनंदन
बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 28 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला फक्त 12 ठिकाणी विजय मिळवता आल्याचं पाहायला मिळतंय. परळी विधानसभा मतदारसंघातसर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आमदार धनंजय […]
-
कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.







