माझ्यासारखी वेळ कोणत्याच मुलीवर येऊ नये; अभिनेत्री करिश्मा कपूर असं का म्हणाली?

माझ्यासारखी वेळ कोणत्याच मुलीवर येऊ नये; अभिनेत्री करिश्मा कपूर असं का म्हणाली?

Actress Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत. परंतु, लग्नाच्या काही वर्षांतच या दोघांच्या संसारात खटके उडायला सुरुवात झाली. अखेर 2016 मध्ये संजय आणि करिश्मा यांनी घटस्फोट घेतला. (Actress) घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

अभिषेक बच्चनसोबत झालेल्या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी माझा वापर करण्यात आला, असा आरोप संजयने करिश्मावर केला होता. इतकंच नव्हे तर तिने फक्त पैशांसाठी लग्न केलं, असंही त्याने म्हटलं होतं. संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी करिश्माचं अभिनेता अभिषेक बच्चनशी साखरपुडा झाला होता. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा झाला होता. परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं संपुष्टात आलं होतं. ज्यावर्षी दोघांचा ब्रेकअप झाला, त्याच वर्षी करिश्माने संजयशी लग्न केलं होतं.

‘आमी डाकिनी’ मधील भूमिकेसाठी राची शर्माने घेतली श्रद्धा कपूरकडून प्रेरणा

अभिषेकसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर एका मुलाखतीत करिश्मा म्हणाली होती, “आता माझी बोलण्याची वेळ आली आहे. मी सर्वांची आभारी आहे. या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. कोणत्याच मुलीवर हे सर्व सहन करण्याची वेळ येऊ नये. मला एकटीलाच दु:खाला सामोरं जावं लागलं. कदाचित आता वेळच सगळ्या गोष्टी ठीक करू शकतो.  मी बरंच काही सहन केलंय. पण माझ्यासोबत जे काही घडलंय, त्याचा मी स्वीकार केला आहे.

मी इतकंच म्हणेन की नशिबात जे लिहिलंय, ते घडतं. परंतु मी माझ्या समस्यांचा सामना करण्यासाठा भावनिकदृष्ट्या तयार नव्हते”, असं ती पुढे म्हणाली. अशा कठीण काळात सर्वांनी तिला एकटं सोडल्याची तक्रार करिश्माने केली होती. ती एकटीच सर्व गोष्टींना सामोरं जात होती. जर माझे आईवडील, बहीण, माझी आजी, माझ्या दोन्ही मावश्या आणि माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी माझ्यासोबत नसते, तर मी यातून कधीच बाहेर पडू शकली नसती”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या