अडचणीला शिवतिर्थावर जाता मग भाषेसाठी काय होत?, अभिनेत्री तेजस्विनी पंडित भडकली

अडचणीला शिवतिर्थावर जाता मग भाषेसाठी काय होत?, अभिनेत्री तेजस्विनी पंडित भडकली

Uddhav Raj Thackeray Joint Victory Rally : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. (Thackeray) यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित उपस्थित होती.

अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेल्या आहेत. सर्वांत आधी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, महाराष्ट्रातला मराठी एकत्र यायला पाहिजे. आता लोकांनी हे जे वातावरण बिघडवलं आहे, यात बिघडण्यासारखं काहीच झालं नव्हतं असं ती म्हणाली आहे.

नाटके केली तर कानाखाली आवाज, उद्योजक केडिया प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

त्याचबरोबर आम्ही हिंदीविरोधात नाही. आम्ही सक्तीविरोधात होतो. मराठी बोलणार नाही, हा अट्टहास का? किमान शिकण्याचा तरी प्रयत्न करा, असंही ती यावेळी म्हणाली. समस्या असल्यास मराठी कलाकार राज ठाकरे यांच्याकडं मदतीसाठी जातात. पण मराठी भाषेचा विषय असतो तेव्हा मोठ्या संख्येने कलाकार का एकत्र येत नाहीत असा थेट प्रश्नही तेजस्विनी पंडितने उपस्थित केला आहे.

मलाही असा प्रश्न पडला आहे की असं का होत नाही. इतर वेळा मदत लागते तेव्हा शिवतिर्थाचे दरवाजे ठोठावले जातात आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा कलाकार का एकत्र येत नाही हा एक दुर्दैवी प्रश्न आहे अवघा महाराष्ट्र आसुसलेला होता या दृष्यासाठी, ते दृष्य पाहण्यासाठी आज आम्ही येथे आलो होतो. मराठीचा विजय साजरा करण्यासाठी या दोन कारणांसाठी मी आज याठिकाणी गेले होते असं देखील ती यावेळी म्हणाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube