प्रेक्षकांचा अथांग प्रतिसाद! ‘देऊळ बंद 2’ ची 100 कोटींची घोडदौड; नफ्यातून साकारणार शेतकरी कन्यांचे भविष्य
Deool Band 2 हा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा मराठी चित्रपटसृष्टीतील मोजक्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
‘Deool Band 2′ races towards the ₹100-crore mark profits to shape future of farmers’ daughters : मराठी चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरला आहे. पहिल्या भागाच्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अथांग प्रतिसाद मिळवत या चित्रपटाने 100 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. शेतकऱ्यांचे सामाजिक प्रश्न आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी आगळीवेगळी कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ‘देऊळ बंद २’ ने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आणि परदेशातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा मराठी चित्रपटसृष्टीतील मोजक्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित, लेखक आणि दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या लेखणी आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा खिळवून ठेवले. निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्या कसदार आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या आणि सर्व सहकलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चित्रपटातील भावनिक आणि आध्यात्मिक प्रसंग अधिक गडद झाले आहेत.
अयोध्येप्रमाणे शिर्डीत दान चोरी होऊ शकते? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले
या अभूतपूर्व यशासोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच एक अत्यंत कौतुकास्पद आणि संवेदनशील निर्णय घेतला होता आणि तो म्हणजे ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटातून मिळणारा संपूर्ण नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. व्यावसायिक यशासोबतच सामाजिक भान जपण्याचा हा उपक्रम संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी आदर्श ठरणारा आहे.
S. Sreesanth : बिनशर्त माफीनंतर श्रीसंतला दिलासा; ‘त्या’ प्रकरणात केसीएने उठवली तीन वर्षांची बंदी
चित्रपटाच्या या यशावर बोलताना लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे आणि निर्माते कैलाश वाणी म्हणाले: “हा केवळ आमच्या चित्रपटाचा सन्मान नाही, तर संपूर्ण मराठी रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाचा बहुमान आहे. स्वामींच्या भक्तीवर आणि आम्ही मांडलेल्या विचारांवर प्रेक्षकांनी दाखवलेला विश्वास थक्क करणारा आहे. या कमाईतून मिळणारा नफा आमच्या शेतकरी बांधवांच्या मुलींच्या भविष्यासाठी खर्च करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या या अथांग प्रेमासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत.”
तुम्हीही ‘पुशी पेरेंट’ आहात का?; जाणून घ्या ‘Pushy Parenting’चे गंभीर परिणाम
भव्य कामगिरी: 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होत ‘देऊळ बंद 2’ ने मराठी सिनेमाची ताकद जागतिक स्तरावर सिद्ध केली आहे. एकमेव उद्देश: चित्रपटाच्या नफ्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या शिक्षणाला बळ दिले जाईल. प्रेक्षकांची पसंती: कौटुंबिक प्रेक्षक, तरुण वर्ग आणि आबालवृद्धांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत चित्रपटाला ‘मास्टरपीस’ म्हणून गौरवले आहे.
विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब; तर, पौड फाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल…
‘देऊळ बंद 2’ चे हे यश आणि त्यांची सामाजिक बांधिलकी मराठी संस्कृतीची आणि सिनेसृष्टीची उंची अधिक वाढवणारी ठरली आहे. तसेच हे यश मराठी सिनेमाची ताकद आणि जागतिक स्तरावरील त्याची पोहोच अधोरेखित करते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर सध्या चित्रपटसृष्टीतून आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.