‘सैराट’ फेम तानाजीचा जात व्यवस्थेतील स्वानुभव, गर्लफ्रेंड वेगळ्या जातीची असल्याने आईचा नकार

‘सैराट’ फेम तानाजीचा जात व्यवस्थेतील स्वानुभव, गर्लफ्रेंड वेगळ्या जातीची असल्याने आईचा नकार

Tanaji Galgunde : सैराट चित्रपटात परश्याच्या मित्रांच्या भूमिकेत तानाजी गळगुंडे झळकला होता. (Sairat movie) या चित्रपटामध्ये त्याने ‘लंगड्या’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा मुख्य विषय होता जात व्यवस्था. (Tanaji Galgunde) त्यावरच आता तानाजीने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. सैराटमध्ये जे दाखवलंय तसं कधी आजूबाजूला घडलं आहे का? गावात अजूनही असा भीषण घटना घडतात का? असं विचारल्यावर तानाजीने या विषयावर भाष्य केलं आहे.

त्यांना ते पटणार नव्हतं भूमिकेसाठी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल, सईने सांगितला कास्टिंगचा धक्कादायक अनुभव

या घटना घडण्याचं मुख्य कारण जातव्यवस्था आहे. आपल्याकडे जातव्यवस्था जास्त आहे. तसंच, गरीब आणि श्रीमंत हेही एक त्याला कारण आहे. जातव्यवस्था हे सर्वात मोठं व भीषण कारण आहे. प्रत्येक आई-बाबाला वाटतं की आपल्या मुलीने किंवा मुलाने दुसऱ्या जातीत लग्न करू नये असंही तानाजी यावेळी म्हणाला. यावेळी त्याने स्वत:चं उदाहरण दिलं. तो म्हणाला, माझी गर्लफ्रेंड वेगळ्या जातीतली आहे. दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहोत. मी जातीवाद मानत नाही. मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलो आहे. नात्याला पाच-सहा वर्षे झाली पण मी घरी काहीच सांगितलं नाही. आम्ही दोघेही पुण्यात होतो आणि मी घरी काहीच सांगितलं नव्हतं. कारण त्यांना ते पटणार नव्हतं असं तानाजी म्हणाला.

तिची आई आमच्याच गावची

नंतर माझी गर्लफ्रेंड मला सतत म्हणू लागली की तू तुझ्या घरी सांग की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत आणि सोबत राहणार आहोत. मी तिला म्हटलं अग त्यांना पटणार नाही, मग कशाला सांगायचं. आपण छान राहू, पुढे मुलं-बाळं झाली की थेट त्यांनाच घेऊन जाऊ. कदाचित चुकीचं असेल माझं म्हणणं पण मी तिला हेच सांगायचो. पुढे तिच्या आग्रहास्तव घरी सांगायचं ठरलं. मी तिला म्हटलं की मी बोलणार नाही तूच बोल. माझं ऑपरेशन झाल्याने काळजी घ्यायला आई पुण्यात आली होती. गर्लफ्रेंड माझ्या आईच्या ओळखीची होती. कारण तिची आई आमच्याच गावची होती. लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. आईला सांगायचं ठरल्यावर मी तिला नाही म्हटलं पण तिने ऐकलं नाही.

आई रागावली RSS प्रमुख मोहन भागवतांनी अँटिलियामध्ये; अनंत-राधिकाच्या लग्नाआधी घेतली अंबानी कुटुंबाची भेट

आमचं काय चाललंय हे आईला माहीत नव्हतं तोपर्यंत त्या दोघींचं छान जमायचं. दोघी एकेठिकाणी बसून चर्चा करत असताना पाहिलं. माझी आई तिला नाही, नाही म्हणत होती. गर्लफ्रेंड आत आल्यावर तिला विचारलं, झालं का बोलणं? ती म्हणाली, ‘हो, पण त्या नकार देत आहेत.’ मी तिला बोललो की मी हेच तुला सांगतोय, त्यांना ही गोष्ट पटणार नाही तर नको सांगायला, आपण राहू एकत्र. पण ती पुढे राहिली नाही. ती निघून गेली असंही तानाजी यावेळी म्हणाला. तसंच, गर्लफ्रेंड गेल्यावर आई रागावल्याचंही त्याने सांगितलं.

तिचं कुटुंब पुढारलेलं आहे

आईने मग माझ्यावर राग काढायला सुरुवात केली. तुला यासाठीच पुण्याला पाठवलं का वगैरे बरंच बोलली. मी तिला म्हटलं मी त्या मुलीबरोबर राहणार आहे, तुम्हाला काही अडचण आहे का? खरं तर तुम्हाला विचारायचं होतं पण तुमच्या विचारांमुळे हिंमत नाही झाली, कारण तुम्ही नकार देणार हे मला माहीत होतं. मग आमचं कडाक्याचं भांडण झालं. ‘दुसरी कोणतीही मुलगी आण पण तिच्यासोबत नाही राहायचं,’ असं ती म्हणत होती. का तर तिला गाव ओळखतं आणि गावाला माहीत आहे की ती कुणाची मुलगी आहे आणि ती कोणत्या जातीची आहे. दुसऱ्या जातीची तू आण आमची हरकत नाही, आमचा जातीला विरोध नाही, पण ती नको आणि अशी आण की जी गावाला माहीत नाही. मला या विचारसरणीचा दबाव आला, ते सगळं कसं सांभाळू हे मला कळत नव्हतं, असंही तानाजी म्हणाला. तसंच, मुलीच्या घरून एवढा विरोध नव्हता. ती पुण्यात राहायची आणि तिचं कुटुंब पुढारलेलं आहे, असंही तानाजीने सांगितलं. स्वतःत हे सगळे बदल ‘सैराट’नंतर पुण्यात आल्यावर झाले, असंही त्याने यावेळी नमूद केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज