तुषार घाडीगावकरकडे काम नव्हते असं म्हणणे चुकीचे, अभिनेता अंकुर वाढवेची पोस्ट व्हायरल

Ankur Vadhe On Tushar Ghadigaonkar : मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर (Tushar Ghadigaonkar) याने 21 जून शुक्रवार रोजी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याबाबत आतापर्यंत कोणतीही माहीती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे मराठी अभिनेता अंकुर वाढवे (Ankur Vadhe) याने सोशल मीडियावर मोठा दावा करत तुषारकडे काम नव्हाता म्हणून त्याने आत्महत्या केली असं एका पोस्टमध्ये म्हटले आहे. या दाव्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले होते मात्र आता अंकुर वाढवे याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये माझ्या एका वाक्याचा विपर्यास केला जात असल्याचा म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाला अंकुर वाढवे?
अभिनेता अंकुर वाढवे याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, अत्यंत चुकीच्या बातमी पसरवली जातीय माझ्या पोस्ट मधल्या एका वाक्याचा विपर्यास केला जातोय “काम येतात जातात” म्हणजे काम नव्हती असा अर्थ होत नाही तुषार व्यवस्थित काम करत होता मी अत्यंत जबाबदारीने लिहितोय मित्र गेलात त्याची कारण त्याच्यासोबत गेली पण ह्या बातम्या योग्य नाहीत.
तर दुसरीकडे यापूर्वी त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, ्मित्रा का? कश्यासाठी? आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! Tushar Ghadigaonkar तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो. असं लिहिले होते.
View this post on Instagram
तुषार घाडीगावकर मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील होता. नाटकातून त्याने अभिनयाला सुरुवात केली होती. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्य विभागामध्ये तुषार सक्रिय होता. मित्रांमध्या ‘घाड्या’ म्हणून तुषार ओळखला जात होता. कॉलेजनंतर मालिका, चित्रपट असा प्रवास तुषारचा प्रवास सुरू झाला होता. ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ आणि ‘सखा माझा पांडुरंग’ अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
PF मधून कधी आणि किती पैसे काढता येणार? जाणून घ्या EPFO चे नवीन नियम