Iran Vs Israel : अरब, मंगोल ते इराकपर्यंत, इराणचा इतिहास रक्तपाताने भरलेलाच….

Iran War History : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल या दोन देशांत जोरदार युद्ध सुरू असून, इतिहासात डोकवल्यास इराणचा युद्ध इतिहास खूप जुना (Iran Israel Conflict) असल्याचे दिसून येते. अनेकवेळा हा देश हरला, अनेक वेळा जिंकला. अनेक वेळा युद्धबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे इतिहासाची पाने इराणच्या युद्धांनी भरलेली आहेत. आता जेव्हा इराण पुन्हा एकदा इस्रायलशी युद्ध लढत आहे, तेव्हा ही पाने पुन्हा नव्याने उलगडली जात असून अनेक मनोरंजक गोष्टीही समोर येत आहेत. त्याचाच घेतलेला हा आढावा…
Iran India Relation : इराणचं भारतीयांना मोठं गिफ्ट! व्हिसा नसला तरीही मिळणार एन्ट्री
इराणचा इतिहास रक्तपाताने भरलेला
इराणमधील आतापर्यंतच्या युद्धांचा इतिहास पाहिला तर, ही भूमी रक्तपाताने भरलेली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनीही राज्य केले, मग ते अरब असोत, मंगोल असोत किंवा तुर्क असोत, सर्वांनी पर्शियन संस्कृती स्वीकारली. कोणीही ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. अशा परिस्थितीत, इराणवर (Iran) आलेले हे संकटही टळेल असे मानले पाहिजे. कारण इतिहास साक्षी आहे की, अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देश इराणविरुद्ध इराकी हुकूमशहा सद्दाम हुसेनसोबत सावलीसारखे उभे राहिले, त्याच अमेरिकेने सद्दाम हुसेनला बंकरमधून बाहेर काढत मारले. आज G-7 देश इराणविरुद्ध उभे आहेत, उद्या ते सत्ता बदलली तरी त्यांच्यासोबत उभे राहतील ही मोठी गोष्ट नाही. कारण प्रत्येक देशाचे स्वतःचे हितसंबंध असून, सर्व देश आपापल्या सोयीनुसार हालचाली करत आहेत.
आजचा इराण म्हणजे पूर्वीचा पार्शिया
आज आपण ज्या इराणला ओळखतो त्याला पूर्वी “पर्शिया” या नावाने ओळखले जाते असे. 1935 मध्ये हे नाव बदलून “इराण” करण्यात आले, ज्याचा अर्थ “आर्यांची भूमी” असा होतो. इराण हा एक अतिशय समृद्ध आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे. म्हणूनच शतकानुशतके वेगवेगळ्या शक्तींनी या देशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांशी दोन हात करण्यासाठी इराणने अरबांपासून मंगोलपर्यंत डझनभर युद्धे
लढल्याची इतिहासात नोंद आहे.
Iran vs Israel Military Power: इराण इस्रायलमध्ये युद्ध पेटलं तर कोणाकडे किती लष्करी पावर?
अरबांशी झालेल्या युद्धांनंतर इराणचे ससानी साम्राज्य कोसळले
ही सातव्या शतकातील गोष्ट आहे. इराणमध्ये ससानी साम्राज्य होते. हे साम्राज्य खूप शक्तिशाली होते. याचदरम्यान अरबांची नजर यावर पडली आणि त्यांनी हल्ला केला. एकामागून एक अनेक युद्धे लढली गेली, त्यानंतर ससानी साम्राज्याचा अंत झाला आणि इराणमध्ये इस्लामिक राजवटीचा पाया रचला गेला. अरबांनी स्थापन केलेली पहिली इस्लामिक राजवट, रशीदुन खलिफाटने हे हल्ले केले. या काळात आणि त्यापूर्वी आणि नंतर अनेक युद्धे लढली गेली. प्रमुख युद्धांपैकी एक म्हणजे धी कारची लढाई, जी ससानी साम्राज्य आणि अरबांमध्ये झाली होती. या युद्धात ससानी साम्राज्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे अरबांचे मनोबल वाढले होते.
याशिवाय आणखी एक युद्ध अल-कादिसियाची लढाई म्हणून ओळखले जाते. हे सध्याच्या इराकमधील कुफ्याजवळील एक ठिकाण होते. त्यावेळी पर्शियन सेनापती रुस्तुम फारुखजाद आणि अरब सेनापती साद इब्न अबी वक्कास यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये ससानी साम्राज्याला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांची राजधानी कटेसिफ़ोन काबीज करण्यात आला. निर्णायक मानले गेलेल्या या युद्धापासूनच ससानी साम्राज्याचा पतन होण्यास सुरूवात झाली.
क्टेसिपॉनच्या पतनानंतर पर्शियन लोकांनी, म्हणजेच ससानिद साम्राज्याने त्यांची उरलेली ताकद गोळा केली आणि पुन्हा एकदा समोरासमोर युद्ध झाले. इतिहासात, याला जलुलाची लढाई म्हणून ओळखले जाते. यावेळी अरबांना उत्तर इराकचा ताबा मिळाला. याचा अर्थ असा की पर्शियन शासकांना पराभवाला सामोरे जावे लागले. पश्चिम इराणमध्येही एक युद्ध झाले. याला नहवंदची लढाई म्हणून ओळखले जाते यावेळी पर्शियन सेनापती फिरोजान आणि अरब सेनापती नुमान इब्न मुकरिन त्यांच्या सैनिकांशी आमनेसामने आले. यानंतर ससानी साम्राज्याचा अंत झाला. शेवटचा ससानी सम्राट याजदेगेर्ड-तिसरा होता, जो युद्धानंतरही पळ काढत राहिला आणि शेवटी मारला गेला. ही घटना इ.स. 651मध्ये घडली.
“इस्त्रायलची मदत करू नका”, ‘त्या’ आतल्या बातमीचा सुगावा लागताच रशियाचा अमेरिकेला इशारा
अन् शिया समुदायाचा विकास झाला
यानंतर, इस्लामिक चळवळीचा विस्तार झाला. खलीफा उमरच्या राजवटीत, इस्लामचा प्रसार आणि विस्तार त्याच्या प्रदेशात झाला. इस्लामिक एकता आणि धर्माच्या नावाखाली युद्धे सुरूच राहिली. कालांतराने, पर्शियन संस्कृतीचे पालन करणाऱ्यांनी इस्लामला आत्मसात करण्यास सुरुवात केली. याचा फायदा असा झाला की इस्लामिक युगात पर्शियन भाषा, साहित्य आणि प्रशासनाला नवीन जीवन मिळाले. अशाप्रकारे, इराणमध्ये हळूहळू शिया इस्लामचा विकास झाला, जो नंतर इस्लामिक जगात एक वेगळी ओळख निर्माण करू शकला. आज शिया समुदाय जगभरात वास्तव्यास असून, सध्याचे इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी हे देखील शिया समुदायाचे धार्मिक नेते आहेत.
तुर्किने अनेक युद्धे लढली आणि नंतर इराणमध्ये मिळवली सत्ता
11 व्या ते 12 व्या शतकात, इराणमध्ये बुयिद आणि गझनवी सारख्या शासक शक्ती होत्या. ज्या इस्लामिक होत्या परंतु, पर्शियन संस्कृतीने प्रेरित होत्या. या काळात, तुर्क, विशेषतः सेल्जुकचा प्रभाव हळूहळू मध्य आशियामध्ये वाढत गेला, जो हळूहळू इस्लामिक जगाची नवीन शक्ती म्हणून उदयास आला. सेल्जुक तुर्क ही एक सुन्नी मुस्लिम जमात होती, ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि खलिफाची वैधता स्वीकारून आपली शक्ती वाढवली. हळूहळू त्यांनी इराण, इराक, सीरिया आणि तुर्कीमध्ये आपले साम्राज्य वाढवले. या काळात सेल्जुकांनी इराणमधून पर्शियन शासकांना काढून टाकून सत्ता मिळवली.
इस्रायलचे ‘आयर्न डोम’ इराणने भेदले ? कसे काम करते ‘सुरक्षाकवच’ ?
1040 च्या सुमारास बुयद राजवंशाचा नाश झाला. सुन्नी तुगरुल बेग बगदादला गेला आणि अब्बासी खलिफाकडून “सुलतान” ही पदवी घेतली. त्यानंतर सेल्जुक तुर्कांनी दांडनाकानच्या लढाईत गझनवी शासक मसूदचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी खुरासान आणि इराणचा मोठा भाग ताब्यात घेतला. मात्र, सेल्जुकांनी दरबाराची भाषा म्हणून पर्शियन भाषा ठेवली. या काळात उमर खय्याम, अल-गझाली आणि निजाम अल-मुल्क सारखे विद्वान उदयास आले. या सर्व युद्धांचा परिणाम असा झाला की, सुन्नी शासकांनी पर्शियन परंपरेने इस्लामिक-तुर्की राज्य स्थापन केले. त्यांनी पर्शियन संस्कृती नष्ट केली नाही, तर ती स्वीकारली. त्यांनी मदरसे, वास्तुकला आणि इस्लामिक तत्वज्ञान पुढे नेण्याचे काम केले. इतिहासातील या काळाला पर्शियन-इस्लामिक संस्कृतीचा सुवर्णकाळ असेही म्हटले जाते.
खामेनेईंना मारल्यास युद्ध संपणार? उत्तराधिकारी कोण असणार? इस्त्रायलच्या विविधानाने चर्चांना उधाण
चंगेज खानने युद्ध सुरू केले अन् नातवाने साम्राज्याची स्थापना केली
13 व्या शतकाच्या सुरुवातीला मंगोल नेता चंगेज खानची नजर या प्रदेशावर पडली. 1219 ते 1260 दरम्यान या प्रदेशात पुन्हा युद्धे सुरू झाली. साम्राज्याचा विस्तार आणि व्यापारी मार्ग काबीज करण्याच्या उद्देशाने चंगेज खानने हल्ले सुरू केले. त्यावेळी ख्वारिझम शाही साम्राज्य इराणवर राज्य करत होते. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. मोठ्या संख्येने लोक मारले गेले.
काही दिवस राज्य केल्यानंतर चंगेज खानच्या पुढच्या पिढीतील हुलागूने पश्चिम आशियात विस्ताराची मोहीम सुरू केली. त्याने बगदादवर हल्ला केला आणि अब्बासी खलिफाचा वध केला. त्यानंतर इराणमध्ये इल्खानिद साम्राज्याची स्थापना झाली. या युद्धामध्ये लाखो लोकांचे प्राण गेले. अनेक बौद्धिक आणि सांस्कृतिक केंद्रे उद्ध्वस्त झाली एवढेच नव्हे तर, अर्थव्यवस्थादेखील कोलमडली. तथापि, नंतर मंगोल शासकांनी इस्लाम स्वीकारला आणि पर्शियन संस्कृती स्वीकारली.
कायम एकमेकांची साथ देणारे कट्टर शत्रू कसे झाले?, इस्रायल-इराणमध्ये रक्तरंजीत युद्ध का पेटलं?
तेव्हा इस्त्रायल इराणच्या पाठिशी उभा राहिला
युद्धांच्या ऐतिहासिक काळातील आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे 22 सप्टेंबर 1980 रोजी जेव्हा इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी इराणवर हल्ला केला तेव्हा इस्रायल इराणच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. 7 जून 1981 रोजी इस्रायलने इराकची राजधानी बगदादजवळील अणुभट्टीवर बॉम्बहल्ला करत तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला होता. त्यावेळी मेनकेम बेगिन इस्रायलचे पंतप्रधान होते. त्यांना भीती होती की, जर इराकने अणुशस्त्रे बनवली तर, ते इस्रायलवर हल्ला करतील आणि हीच भीती आज इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मनात इराणबाबत आहे.