बांगलादेशातील हिंसाचार चिघळला; वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग, 27 वर्षात पहिल्यांदा पेपर छापला नाही
‘प्रोथम आलो’चे कार्यकारी संपादक सज्जाद शरीफ यांनी बांगलादेशातील वृत्तपत्रांसाठी ही सर्वात काळी रात्र असल्याचे म्हटलं आहे.
शेख हसीना यांचे विरोधी पक्षनेते उस्मान हादी यांच्या निधनानंतर बांगलादेशात (Sheikh Hasina) पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. आंदोलकांनी ढाका येथील प्रोथोम आलो आणि द डेली स्टार या दोन प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावली आहे. या घटनेनंतर माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक वृत्तपत्रांनी या घटनेचे वर्णन सर्वात गडद रात्र म्हणून केलं आहे. गेल्या 27 वर्षांत प्रथमच या घटनेमुळे प्रोथोम आलोचे मुद्रण थांबवण्यात आलं आहे. सध्या सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.‘प्रोथम आलो’चे कार्यकारी संपादक सज्जाद शरीफ यांनी बांगलादेशातील वृत्तपत्रांसाठी ही सर्वात काळी रात्र असल्याचे म्हटलं आहे.
‘संपूर्ण बांगलादेश हादरणार आहे’, उस्मान हादीची हत्या अन् प्रेयसीला सांगितलेली Inside Story
“काल रात्री काही उपद्रवी लोकांनी आमच्या मीडिया हाऊसची तोडफोड केली, जेव्हा आमचे पत्रकार कालच्या वृत्तपत्रांवर आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करत होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. ते म्हणाले की, उस्मान हादी यांच्या निधनानंतर समाजात संताप होता. त्या रागाचा उपयोग उपद्रवींनी वर्तमानपत्रांचे नुकसान करण्यासाठी केला आहे. या घटनेमुळे अनेक पत्रकार कमालीचे भयभीत झाले आहेत.
आपला जीव वाचवण्यासाठी त्याला कार्यालयातून पळून जावे लागले. “1998 मध्ये आमची स्थापना झाल्यापासून, आम्ही 27 वर्षांपासून सातत्याने शोधनिबंध प्रकाशित करत आहोत. आम्ही आमचे वृत्तपत्र प्रकाशित न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्तमानपत्रांसाठी ही सर्वात गडद रात्र आहे. अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी शरीफ यांनी केली.
हा आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि वृत्तमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी योग्य चौकशी करावी आणि त्यांना कायद्याखाली आणावे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे 12 डिसेंबर रोजी विद्यार्थी नेता उस्मान हादी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हादी यांना तातडीने ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले, नंतर त्यांना उपचारासाठी सिंगापूरला पाठवण्यात आले. सहा दिवसांनंतर तो मरण पावला.
