ठाकरेंच्या पॉडकास्टची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले, त्यांचं फक्त फेसबुक लाईव्ह…

ठाकरेंच्या पॉडकास्टची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले, त्यांचं फक्त फेसबुक लाईव्ह…

Udhdhav Thackeray Camp Podcast :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आम्ही जनतेमध्ये जातो अन् ते फक्त ऑनलाईन उपस्थित असतात, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना सुनावले. यावेळी ते नवी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची एकत्रित पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.

उद्धव ठाकरेंच्या गटाकडून यूट्यूबवर चॅनले सुरु करण्यात आले असून त्यावर पॉडकास्ट सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच निकाल काय आहे, याविषयी ठाकरे गटाचे नेते माहिती देणार आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. त्यामध्ये काही बदल घडवायचा आहे की, सुप्रीम कोर्टाला सल्ला देण्याचा विचार आहे, असा टोला शिंदेंनी लगावला.

‘पवार साहेबांचे डायलॉग सेम, त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत’; फडणवीसांचा खोचक टोला

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरेंना चिमटा काढला. जे जनतेचे नेते असतात ते संवाद करतात. आम्ही रोज लोकांमध्ये जातो, त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी संवाद करतो. जे घरी बसून राजकारण करतात ते पॉडकास्ट करतात, ते एकतर्फी संवाद करतात, ते फेसबूक लाईव्ह करतात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. याचा परिणाम होत नाही, ते ऑनलाईन असतील आम्ही जमिनीवर आहोत, असा चिमटा त्यांनी ठाकरेंना काढला.

Kolhapur : दंगलीमागे उद्धव ठाकरेंचा हात; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी शरद पवारांना देखील टोला लगावला. फडणवीस म्हणाले, ट्रेंड बदलण्याची स्वप्नं पवार साहेब वर्षानुवर्षे पाहत आहेत पण त्यांची स्वप्न कधी पूर्ण झाली नाहीत. 2014 ला पाहिली, 2019 ला पाहिली, लोकसभेतही पाहिली विधानसभेतही पाहिली. हे असेच डायलॉग 2014 मध्ये होते. 2019 मध्येही ते हेच बोलले. निवडणुका आल्या आता आम्हालाही पवार साहेबांची सवय झाली. निवडणुका आल्या की पवारसाहेबांचे डायलॉग काय असतील. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे अरे कुठंय 300 लोकं निवडून द्यायला लागले आहेत मोदींच्या नावावर आणि यांना मोदीविरोधी वातावरण दिसतंय. त्यामुळे हे सगळं चालत कारण निवडणुका जवळ आल्यात, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube