अखेर ‘महाराष्ट्र भूषण’च्या घटनेच्या चौकशीसाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा, अशी असेल समिती!

  • Written By: Published:
अखेर ‘महाराष्ट्र भूषण’च्या घटनेच्या चौकशीसाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा, अशी असेल समिती!

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता अखेर राज्य सरकारकडून एक सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावरून याची घोषणा केली आहे.

रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे.

पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं गुडघ्याला बाशिंग…

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे म्हणाले की, ” खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. एका महिन्याच्या मुदतीत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी,दक्षता घ्यावी, याबाबतही ही समिती शासनास शिफारशी करेल.”

नवी मुंबईच्या खारघर येथील सेंट्रल पार्क परिसरात राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील दिल्लीहून आले होते. शाह यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमित शाह येणार असल्यामुळं साहजिकच हा कार्यक्रम भरगच्च होणार होता.

राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का; बाजार समितीच्या रणधुमाळीत तालुकाध्यक्षच फोडला !

या पुरस्कार सोहळ्याला धर्माधिकारी यांच्या लाखो भाविकांनीही हजेरी लावली होती. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात झालेल्या या कार्यक्रमात उष्माघाताने अनेकांचे बळी घेतले, तर शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटूंबियांना तातडीनं मदत जाहीर केली. मात्र, सरकारने जाहिर केलेली ही रक्कम तोकडी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube